Ramayan Sai Pallavi Sita Sister Buzz: नितेश तिवारी दिग्दर्शित रामायण चित्रपटाची सध्या एकच चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटाचा ट्रेलर आल्यामुळे कोणती भूमिका कोणी केली? याचं प्रेक्षकांमध्ये कुतूहल आहे. अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम च्या भूमिकेत दिसणार असून साउथ अभिनेत्री साई पल्लवी सीतेच्या भूमिकेत दिसणार आहे. पण, सध्या सोशल मीडियावर एका वेगळ्याच अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.या अभिनेत्रीने साई पल्लवीलादेखील मागे टाकलंय. मुख्य भूमिकांशिवाय इतर भूमिका कोणी कोणी केल्या आहेत, हे जाणून घेण्यासाठी सध्या प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. या चित्रपटात सीतेच्या बहिणीच्या भूमिकेत असणाऱ्या अभिनेत्रीने सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर अनेक पोस्ट सध्या व्हायरल होताना दिसतात.नेमकी कोण आहे ही अभिनेत्री? जाणून घेऊया...

Continues below advertisement

साई पल्लवीऐवजी ही अभिनेत्री लक्ष वेधून घेतेय ..

'रामायण' चित्रपटात सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी दिसणार आहे.साई कायमच तिच्या साधेपणासाठी ओळखली जाते. ट्रेलरमधील तिच्या भूमिकेवरून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या. अनेकांना तिच्यापेक्षा तिच्या मागे उभी असलेली अभिनेत्री जास्त भावली आहे. ट्रेलरमधील साई पल्लवीच्या एन्ट्री सीन मध्ये तिच्यासोबत इतर दोन-तीन अभिनेत्री उभ्या आहेत. त्यापैकी डावीकडे उभ्या असलेल्या अभिनेत्रीची एक छोटीशी झलक समोर आल्यानंतर इंटरनेटवर प्रचंड चर्चा सुरू झाली आहे. साई पल्लवीच्या मागे उभी असलेल्या या अभिनेत्रीचं नाव सुरभी दास असं आहे. रामायण चित्रपटात ती सीतेच्या धाकट्या बहिणीची म्हणजे श्रुतकीर्तीची भूमिका साकारताना दिसणार आहे. 

Continues below advertisement

कोण आहे सुरभी दास?

'पंड्या स्टोअर', 'निमा डेंजोगपा ' मालिकांमध्ये तिने प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.सुरभीने सोशल मीडियावरही ती सीतेच्या धाकट्या बहिणीची श्रुतकीर्तीची भूमिका साकारत असल्याचं सांगितलं. यावेळी तिचं कास्टिंग कसं झालं याचाही उलगडा तिने केला.ती म्हणाली 'सुरुवातीला कास्टिंग डिरेक्टर मुकेश छाब्रा यांचा ऑफिसमध्ये या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं होतं.ऑडिशन दिल्यानंतर दोन महिन्यांनी निर्मात्यांकडून फोन आला.त्यावेळी मी पंड्या स्टोरी या मालिकेत काम करत होते.ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर सुरभीची एकच चर्चा होतेय.

हिंदी मालिकांमध्ये काम करण्यापूर्वी सुरभीने चित्रपट आणि टीव्ही क्षेत्रात काम केलं आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी आसाम होऊन ती मुंबईला आली होती. 'निमा डेंजोगप्पा' या मालिकेतून तिने हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत पदार्पण केलं.नंतर 'पंड्या स्टोरी' या मालिकेतून तिला प्रचंड लोकप्रियता मिळाली.