Rakhi Sawant : व्हॅलेंटाईन डेच्या एक दिवस आधी राखी सावंतने (Rakhi Sawant) पती रितेशपासून वेगळे झाल्याची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचा धक्का दिला. राखीने सोशल मीडियावर एक लांबलचक चिठ्ठी लिहून रितेशसोबतचे लग्न मोडत असल्याचे सांगितले होते. आता एका मुलाखतीत राखीने याबाबत प्रतिक्रिया दिली आहे.


राखीने एका वृ्त्तपत्राला मुलाखत दिली आणि रडत रडत म्हणाली की, 'तो मला सोडून निघून गेला. मी त्याच्यावर खूप प्रेम केले आणि तो मला सोडून गेला. बिग बॉसनंतर आम्ही मुंबईत माझ्या घरी एकत्र राहत होतो पण एके दिवशी रितेश अचानक बॅग पॅक करून निघून गेला. त्याने आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोट न दिल्याने आणि आता त्याला माझ्यासोबत राहायचे नाही म्हणून तो काही कायदेशीर अडचणीत असल्याचे त्याने सांगितले. तसेच व्यवसायात आपले मोठे नुकसान झाले असून खूप पैसे बुडाले असल्याचेही त्यांने सांगितले.' असंही राखीने सांगितलं आहे.



राखीने सांगितले की, 'बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतर जेव्हा मला समजले की त्याला पत्नी आणि मूल आहे, तेव्हा माझे हृदय तुटले. मी कोणत्याही स्त्री किंवा मुलावर अन्याय करू शकत नाही. आता मला वाटू लागले आहे की त्याने मला सोडल्याने आयुष्यातील सर्व काही संपले.'


रितेशसोबतच्या लव्हस्टोरीबाबत राखी पुढे म्हणाली, 'आम्ही व्हॉट्सअॅपद्वारे संपर्कात आलो. सहा महिने एकमेकांसोबत चॅट केले. रितेशने मला त्याचे लोकेशन, बँक खात्याचे तपशील आणि सर्व काही पाठवले, ज्यामुळे माझा त्याच्यावर विश्वास बसला. त्यानंतर त्याने मला लग्नासाठी प्रपोज केले. माझे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले. जर त्याचा घटस्फोट झाला आणि त्याला माझ्याकडे परत यायची इच्छा असेल तर मी त्याची वाट पाहीन.'


संबंधित इतर बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha