मुंबई : कोरोना व्हायरसच्या संकटामुळे सर्वजणांना घरी बसून राहावे लागत आहे. प्रत्येकाच्या मनात एकप्रकारे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रलय आला की काय? अशाही शंका आता लोकांच्या मनात यायला लागली आहे. मात्र, आकाशाचे देणे काही आज-उद्या फिटत नाही णि इतक्या लवकर प्रलय होईल, असे काही वाटत नाही, असं कवी संदीप खरे म्हणत आहे. लॉकडाऊनकडे अनेकजण संधी म्हणून पाहत आहेत. कवी संदिप खरे या लॉकडाऊनच्या काळात काय करतात? आताच्या परिस्थितीविषयी त्यांना नेमकं काय वाटतं, या पार्श्वभूमीवर ते आज माझा कट्टा वर आले होते. यावेळी संदीप खरे यांच्या खजिन्यातून उलगडलेल्या, आयुष्यावर भाष्य करणाऱ्या कवितांसह गप्पांची मैफल रंगली. आपण घरात सुरक्षित राहावे, यासाठी अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचारी जी मेहनत घेत आहेत. त्या सर्वांचा आपण आदर करायला हवा, अशी विनंती संदिप खरे यांनी व्यक्त केली. आयुष्यात प्रत्येकाला खूप काही गोष्टी करायच्या असतात. मात्र, काही कारणाने त्या राहून जातात. मात्र, आताच्या या लॉकडाऊनमुळे अशा अनेक गोष्टी करता येत आहे. कुटुंबासोबत वेळ घालवतोय. मला पुस्तक वाचायला खूर आवडतात. सध्या मी अशी पुस्तके घरातील सदस्यांना वाचून दाखवत आहे. हे करायला खूप मज्जा येत असल्याचे संदिप यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीला अनुसरून त्यांनी त्यांची एक कविता सादर केली. सरकारकडून सन्मान नाही; रामायणात प्रभू राम साकारलेल्या अरुण गोविल यांची खंतप्रलय... उगाच काय गं छोट्या मोठ्या गोष्टीवरून इतके वादउगाच काय माझ्यासकट जगण्याचाही सोडतेस नादमी, तू , जगणे, पृथ्वी, कोणीच इतके वाईट नाहीआधीरपणावाचून इथे दुसरे कोणी घाईत नाहीअगं विरस व्हावा इतके काही उडले नाहीत इथले रंगस्पेशल इफेक्टस्‌शिवायसुद्धा शहारून येऊ शकते अंगअजून आहे आकाश निळे, अजून गुलाब नाजूक आहेतअजून तरी दाही दिशा, आपल्या आपल्या जागी आहेतपैसे भरल्यावाचून अजून, डोळा तारे दिसत आहेतझाडांच्याही सावल्या, अजून विनामूल्य पडत आहेतअजून तरी कर नाही, आपले आपण गाण्यावर‘सा’ अजून ‘सा’ च आहे, ‘रे’ तसाच ऋषभावरअजून देठी तुटले फूल, खाली पडते जमिनीवरछाया पडता पायाखाली, सूर्य असतो डोईवरस्पॉन्सर केल्यावाचू अजून, चंद्र घाली चांदणभूलअजून कुठल्या वचनाशिवाय, कळी उमलून होते फूलसागर अजून, गणतीवाचून, लाटेमागून सोडी लाटअजून तरी कुठली जकात घेत नाही पाऊल वाटथंडी अजून थंडी आहे, ऊन आहे अजून ऊनपाऊस पडता अजूनसुद्धा माती हसते आनंदूनकाही काही बदलत नाही, त्वेषाने वा प्रेमानेजन्मानंतर अजून तसेच मरण येते इमानेआकाशाचे देणे काही आज-उद्या फिटत नाहीआणि इतक्या लवकर प्रलय होईल, असे काही वाटत नाही आपल्या आसपास अशा अनेक गोष्टी असतात ज्याकडे आपलं दुर्लक्ष होतं. मात्र, या लॉकडाऊनच्या काळात मला अशा अनेक गोष्टी समजल्या. अगदी झाडाला पाणी घालताना झाडांशीही संवाद साधता येतो. यावेळी संदिप यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. Corona Relief | विरारमधील दोन भावांनी कोरोनाला हरवलं, वसईत दोन परिचारिकांचीही कोरोनावर मात