Bigg Boss 18: बिग बॉस 18 च (Bigg Boss 18) घर सध्या अनेक तणावपूर्ण घटनांनी भरलेलं आहे. विशेषतः करणवीर मेहरा आणि अविनाश मिश्रा यांच्यातील संघर्षानंतर घरातील वातावरण तापले होते. वीकेंड का वार मध्ये सलमान खानने घरातील वातावरण हलके केलेच पण एका चॅलेंजसह. बिग बॉसच्या घरात टाईम का तांडव असा टास्क आणलाय. जो जिंकेल ज्याला फ्युचर कंट्रोल करण्याचे अधिकार मिळतील असं सांगण्यात आलंय. पण या लढतीत विवियन आणि रजत यांच्या स्पर्धेत तिसऱ्याचाच लाभ झाल्याचं पाहायला मिळतंय. 


नक्की बिग बॉसच्या घरात झालंय काय? 


टाईम का तांडव ही लढत दोन स्पर्धांमध्ये होणार असून रजत दलाल आणि विवियन या दोघांना आमने-सामने बसवण्यात आले होते. या दोघांपैकी कोण अधिक सक्षम आहे यावर घरातील स्पर्धकांना कारणासहित हात वर करायचा होता. पण या दोघांच्या लढतीत तिसऱ्याचाच लाभ झाल्याचं बघायला मिळालं.  विव्हियन आणि रजत या दोघांपैकी कोणत्या बाबतीत कोण उजवे ठरवण्यासाठी सलमानने घरातील स्पर्धकांनाही त्यात सहभागी करून घेतले होते. यात कोण उजवे हे सांगताना आपल्या शांत आणि संयमी वागण्याने करणवीरनं प्रेक्षकांना प्रभावित केल्याचं दिसलं. अतिशय शांतपणे आणि हुशारीने आपली बाजू मांडत घरातील तणावाचे वातावरण नक्की कशामुळे ताणले गेले.. हे सांगताना करणवीर न प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर त्याचं खूप कौतुक होतंय. 


अविनाशवरील आरोपाचं खंडन करत जिंकली प्रेक्षकांची मने 


बिग बॉसच्या घरात काही दिवसांपूर्वी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यात अविनाशवर सुरक्षित वाटण्यावरून करण्यात आलेले आरोप करणवीरने संयमी आणि शांतपणे हाताळले. याचे अनेकांकडून कौतुक होत आहे.