Aishwaryaa Rajinikanth-Dhanush Separated : काही महिन्यांपूर्वी बॉलीवुड सुपरस्टार आमिर खान आणि त्याची पत्नी दिग्दर्शक किरण राव यांनी अचानकपणे घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर आता तामिळ सुपरस्टार अभिनेता धनुष (Dhanush) आणि ऐश्वर्या रजनीकांत (Aishwaryaa Rajinikanth) यांनीही अशाचप्रकारे समाज माध्यमांवर पोस्ट करत अचानक घटस्फोट घेतला आहे. हे दोघेही 18 वर्षांच्या सुखी संसारानंतर विभक्त होत आहेत. दरम्यान धनुष हा प्रसिद्ध अभिनेता असून ऐश्वर्या ही देखील एक दिग्दर्शिका आहे, पण 18 वर्ष एकत्र संसार केल्यानंतरही दोघांनी केवळ एकाच सिनेमात एकत्र काम केलं आहे. तो सिनेमा म्हणजे प्रसिद्ध गाणं Why this Kolavari Di असलेला 3 (Three) सिनेमा. 


....म्हणून ऐश्वर्या आणि धनुष यांचा एकत्र एकच सिनेमा


2012 साली अभिनेता धनुष आणि अभिनेत्री श्रुती हसन अशी कास्ट असलेला थ्री सिनेमा प्रदर्शित झाला होता. पण सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वीच सिनेमातील गाणं Why this Kolavari Di याचा जे धनुषने स्वत: गायलं होतं, त्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. भारतात युट्यूबवर सर्वाधिक पाहिला गेलेला व्हिडीओ म्हणून हे गाणं प्रसिद्ध झालं होतं. ज्यानंतर सिनेमाही अनेकांना आवडला. एक वेगळं कथानक असलेला हा सिनेमाने अनेकांना भुरळ घातली होती. दरम्यान धनुष याने मात्र सिनेमापूर्वीच ऐश्वर्या दिग्दर्शित करणार करणार असलेला माझा हा एकमेव सिनेमा असेल असं स्पष्ट केलं होतं. त्यामुळेच दोघांनीही परत कधीच एका सिनेमावर काम केलं नाही.


सोशल मीडियावर पोस्ट करत धनुष-ऐश्वर्या विभक्त


धनुष आणि ऐश्वर्या या दोघांनी 2004 साली लग्न केलं होतं. या दोघांनाही दोन मुले देखील आहेत. दरम्यान 18 वर्ष एकत्र संसार केल्यानंतर दोघांनी अचानक आपआपल्या सोशल मीडिया हँडलवरुन पोस्ट शेअर करत वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.






ऐश्वर्याने विभक्त झाल्याची माहिती देत लिहिले आहे,"कोणत्याही मथळ्याची गरज नाही. फक्त तुमची समज आणि तुमचे प्रेम आवश्यक आहे".  



हे ही वाचा - 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha