Vidya Balan on Bhool Bhulaiyaa 2 : 'भुल भुलैय्या-2' या सिनेमामुळे विद्या बालन ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. तिच्या मंजुलिका या भूमिकेचा आजही पंसती मिळते. पण असं असलं तरीही विद्या बालनने (Vidya Balan) 'भुल भुलैय्या 2' का केला नाही असा प्रश्न अनेकांना पडला होता. विशेष म्हणजे विद्या बालनला भुल भुलैय्या 2ची ऑफरही होती. तरीही विद्याने हा सिनेमा नाकारला. 


 नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये विद्या बालनने भुल भुलैय्या 2 हा सिनेमा का नाकारला याचं कारण सांगितंल आहे. विद्या बालन आता लवकरच भुल भुलैय्या 3 मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतच माधुरी दीक्षित आणि तिचं गाणंही रिलीज करण्यात आलंय. सोशल मीडियावर या गाण्याला बरीच पसंती मिळत असल्याचं चित्र आहे. 


विद्या बालनने का नाकारला भुल भुलैय्या -2?


भुल भलैय्या 2 विषयी बोलताना विद्याने म्हटलं की, मी घाबरले होते कारण भुल भुलैय्या या सिनेमाने मला बरंच काही दिलं होतं. त्यामुळे मला असं वाटलं की, जर माझ्याकडून काही चुकीचं झालं तर कदाचित सगळंच संपेल.. म्हणूनच मी ही रिस्क घेऊ शकत नाही, असं मी स्पष्टच अनीसजींना सांगितलं होतं. पण जेव्हा माझ्याकडे तिसऱ्या भागाचं स्क्रिप्ट आलं तेव्हा मलाही ते खूप आवडलं. मला बऱ्याच दिवसांपासून भूषण आणि अनीसजींसोबत काम करायचं होतं आणि त्यासाठी ही योग्य संधी होती.


विद्याने भुल भुलैय्या 3 विषयी काय म्हटलं?


दरम्यान विद्याने याचवेळी भुल भुलैय्या 3विषयी देखील भाष्य केलं आहे. तिने म्हटलं की, या सिनेमात माधुरी मॅम देखील आहेत. त्यामुळे मला वाटतं बरं झालं की,मी ही रिस्क घेतली.खूप छान वेळ गेला.बज्मी हा मनोरंजनाचा राजा आहे. मला त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. दिवाळीच्या मुहूर्तावर भुल भुलैय्या 3 सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात कार्तिक आर्यन, माधुरी दीक्षित, तृप्ती डिमरी सारखे  कलाकार झळकणार आहेत.    






ही बातमी वाचा : 


Raj Thackeray : ना काँग्रेस, ना भाजपा 'या' व्यक्तीविरोधात राज ठाकरेंनी लढवली होती निवडणूक; म्हणाले, 'आयुष्यात फक्त एकदाच...'