Salman Khan Aishwarya Rai :  बॉलिवूडमध्ये सलमान खान (Salman Khan) आणि ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) यांची जोडी चाहत्यांना पडद्यावरच नाही तर खऱ्या आयुष्यातही खूप आवडली होती. या दोघांनी 'हम दिल दे चुके सनम' आणि 'हम तुम्हारे हैं सनम' सारख्या चित्रपटात एकत्र काम केले. 'हम दिल दे चुके सनम'नंतर सलमान आणि ऐश्वर्याच्या जोडीने बॉलिवूडमध्ये खळबळ उडवून दिली होती. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाला चांगलेच यश मिळाले होते.  या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही जवळ आले आणि नंतर त्यांच्या अफेअरच्या बातम्याही खूप चर्चेत आल्या. पण, सलमान खान आणि ऐश्वर्या राय एका चित्रपटात भाऊ आणि बहिणीच्या भूमिकेत दिसणार होते. 


या चित्रपटात भाऊ-बहिण होणार होते सलमान-ऐश्वर्या


वर्ष 2000 मध्ये रिलीज झालेल्या 'जोश' या चित्रपटात ऐश्वर्या रायसोबत शाहरुख खान, चंद्रचूड सिंह झळकले होते. या चित्रपटात शाहरुख खानने  ऐश्वर्याच्या भावाची व्यक्तीरेखा साकारली होती. बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत ऐश्वर्याने या काही चित्रपटाबाबत काही किस्से सांगितले. ऐश्वर्याने सांगितले की,  या चित्रपटासाठी सलमान आणि आमिर खान असणार होते. या चित्रपटात चंद्रचूडने साकारलेली भूमिका ही कदाचित आमिर खान आणि शाहरुखच्या भूमिकेत सलमान खान असणार होते. मात्र, त्यानंतर ही भूमिका शाहरुखला देण्यात आली. मला त्याची बहीण व्हायला काहीच अडचण नव्हती. कारण मला वाटले की ते नवीन असेल, ते वेगळे असेल. या भूमिकेत त्याला काहीतरी खास दिसले आणि त्याने चित्रपटातील या भूमिकेला होकार दिला.






सलमान-ऐश्वर्याच्या नात्यात वितुष्ट...


सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची सुरुवात 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटादरम्यान झाली होती. मात्र, सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांचे नाते फार काळ टिकले नाही आणि ते वेगळे झाले. त्यांचं नातं खूप वाईट पद्धतीने संपुष्टात आले होते. त्यावेळी  ऐश्वर्या रायने सलमान खानवर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप केल्याच्या बातम्या आल्या होत्या. यानंतर ऐश्वर्याने अभिषेक बच्चनसोबत लग्न केले.


इतर महत्त्वाची बातमी :