Premachi Goshta Serial Update :   सावनीच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी मिहिर आला असल्याचे पाहून हर्षवर्धनला धक्का बसतो. आता, सावनीकडून  पिच्छा सोडवण्यासाठी हर्षवर्धन नवा प्लान आखतो. तर, दुसरीकडे सागर आणि मुक्तामधील प्रेमाचं नातं आणखी घट्ट होत आहे. हर्षवर्धनचा नवा प्लान यशस्वी होईल का, मिहिरसमोर कोणती नवी अट असणार? 'प्रेमाची गोष्ट' (Premachi Goshta) या मालिकेत आजच्या एपिसोडमध्ये काय पाहणार?


सावनीच्या लग्नाच्या बोलणीसाठी मिहिर आल्याने हर्षवर्धनला धक्का बसतो. त्यातून सावरत तो सावनीला धातूरमातूर उत्तर देतो. हा क्षण आनंदाचा असल्याचे सांगत ती फोटो काढण्यास सांगते. इकडे सावनीच्या पाठिशी मुक्ता आल्याचे पाहून हर्षवर्धन आता लग्नाचा शब्द पूर्ण करावा लागेल याची चिंता वाटते. 


तू इथंपर्यंत आलाय तर आता लग्नाला नकार का द्यायचा असे हर्षवर्धन बळेच म्हणतो. इकडं हर्षवर्धन लगेच तयार झाल्याने मुक्ताच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. 


इकडं घरी आल्यावर मुक्ता आणि सागर कॉफी पीत असताना हर्षवर्धनच्या घरी काय झालं याची चर्चा करत असतात. मुक्ता म्हणते की खरंतर एवढं सगळं सुरळीत झालं याच्यावर माझा सुद्धा विश्वास बसत नव्हता. मिहिरनेदेखील सगळी परिस्थिती एखाद्या मोठ्या माणसाप्रमाणे हाताळली असल्याचे मुक्ता सांगते. यावर हे सगळं तुमच्यामुळेच झाले असल्याचे सागर मुक्ताला सांगतो. कायम विरोधात असणाऱ्या सावनीसाठी एवढं केलं, आदित्य तुमच्याशी नीट बोलत नाही तरीदेखील त्याच्यासाठी खूप काही केले. सागर हे सगळं सांगत असताना मुक्ता शांतपणे ऐकत असते. माझ्याऐवजी तुम्ही मिहिरची समजूत काढायला हवी होती असे मुक्ता सागरला म्हणते. त्यावर सागर हे कसं शक्य होईल असे म्हणते. मुक्ता सागरची समजूत घालत असते.  हे बोलत असतानाच सागर आणि  मुक्तामध्ये प्रेमळ भांडण होत असते.


हर्षवर्धनचा नवा प्लान


मिहिर आल्याने हर्षवर्धनचा तीळपापड होत असतो. मुक्तामुळेच मिहिर घरी आला. सावनीला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करायला हवे हर्षवर्धन सत्यमला सांगत असतो. तेवढ्यात सावनी येते आणि लग्नासाठी किती तयारी केलीय हे सांगत असते. हर्षवर्धनचा चेहरा पडलेला असतो. तेवढ्यात सत्यम हर्षवर्धनने लग्नाबाबत विचार केला असल्याचे  सांगत तू आणि आदित्य मिहिरच्या घरी राहायला जा असे सांगतो. त्यावरून हर्षवर्धन सावनीची समजूत घालतो.  दूर राहिल्याने आपल्यातील प्रेम वाढेल आणि लग्नाच्या विधी योग्य प्रकारे होतील असे हर्षवर्धन सांगतो. हर्षवर्धनच्या बोलण्यावर सावनी भाळते. 


मुक्ता करणार सागरचे कौतुक



इकडं मुक्ता घरी काम करत असताना माधवी तिच्यासाठी सुरळीच्या वड्या आणते. या वड्या खात असताना तुझ्या हातची चव मला कधी येणार असे म्हणते.  जेव्हा लेक आपल्या संसारात छान रमते तेव्हाच तिच्या हाताला तिच्या आईची चव उतरते असे माधवी सांगते. माधवीसोबत मुक्ता गप्पा मारत असताना तिला आठवते की गॅसवर दूध ठेवले आहे. त्यामुळे ती निघून जाते. पण, आई इथेच आहे असं समजून मुक्ता एकटीच बोलत असते. त्यावेळी ती मनातल्या भावना सांगत असते. लग्नाआधी या घरातल्यांबद्दल आपला किती वेगळा विचार होता. पण लग्नानंतर मला समजतं की या घरातले सगळे खूप चांगले आहेत. विशेषत: बापू, लकी आणि सागर खूप सपोर्टिव्ह आहे. मुक्ताकडून सागरचे कौतुक सुरू असते. त्याचवेळी सागर येतो आणि ऐकत असतो. तेवढ्यात मुक्ताचे मागे लक्ष जाते तेव्हा सागर मागेच उभा असल्याचे लक्षात येते. हे पाहून मुक्ता लाजते.