Aishwarya-Abhishek Divorce Rumours: ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) हे बॉलिवूडमधील सातत्याने चर्चेत राहणारं जोडपं आहे. त्यांची जोडीही अनेकांच्या पसंतीस उतरते. पण मागील काही महिन्यांपासून हे जोडपं त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे खूप चर्चेत आल्याचं पाहायला मिळतंय. पण आता यांचं नात तुटण्यासाठी कोण कारणीभूत आहे, अशीही चर्चा रंगली आहे. 


घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्याकडून अद्याप तरी कोणतंही वृत्त फेटाळण्यात आलं नाहीये. त्याचप्रमाणे त्यांच्या सोशल मीडियावरील काही पोस्टमुळे त्यांच्याकडूनही या चर्चांना दुजोरा मिळत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे या दोघांच्या नात्याच्या बऱ्याच चर्चा सुरु आहेत. 


अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांसाठी ही व्यक्ती कारणीभूत?


मिडिया रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान आता एका डॉक्टरचं नाव समोर येत आहे. या डॉक्टरचं नाव दुसरं तिसरं काही नसून जिरक मार्कर असं आहे. जिरक आणि ऐश्वर्या हे दोघेही अनेक वर्षांपासून एकमेकांचे चांगले मित्र आहेत. त्यामुळे आता नेटकऱ्यांचं असं म्हणणं आहे की, जर जिरक आणि ऐश्वर्याचं नाव नसतं जोडलं गेलं तर अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चा झाल्या नसत्या. 


ऐश्वर्या आणि जिरकचे नुकतच एका कार्यक्रमातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यावरुन या दोघांच्या नात्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या दोघांची चांगली मैत्री अभिषेक ऐश्वर्याच्या घटस्फोटाचं कारण ठरणार असल्याचं आता म्हटलं जातंय. पण 'एबीपी माझा' या कोणत्याच चर्चांचा दावा करत नाही. 


ऐश्वर्या आणि अभिषेकच्या घटस्फोटाच्या चर्चा


अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यातील मतभेदाच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरु आहेत. पण या अफवा आणखी पसरल्या जेव्हा संपूर्ण बच्चन कुटुंब अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नासाठी एकत्र आले. तर सून ऐश्वर्या राय आपली मुलगी आराध्यासोबत वेगळी पोहोचली होती. त्यातच ज्या व्यक्तीसोबत ऐश्वर्याचं नाव जोडंल जात आहेत, त्याच जिरक मार्करची एक ग्रे घटस्फोटासंबंधीची पोस्ट अभिषेकने लाईक केली होती. त्यामुळे या चर्चांना आणखीनच उधाण आल्याचं पाहायला मिळालं. अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन यांचे लग्न एप्रिल 2007 मध्ये झाले होते.      


ही बातमी वाचा : 


Shefali Jariwala : 'बाल्कनीत उभी होते, जीवही गेला असता पण...', 'काँटा लगा गर्ल'च्या आयुष्यातली वेदनादायी प्रसंग