Bollywood Actress : बॉलिवूडमधील (Bollywood) सिनेमे जेवढ्या अभिनेत्यांच्या भूमिकेमुळे गाजतात. तेवढीच अभिनेत्रींच्या भूमिकानांही प्रेक्षकांची पसंती मिळते. माधुरी दिक्षित (Madhuri Dikshit) पासून अनुष्का शर्मापर्यंत (Anushka Sharma) अनेक अभिनेत्रींनी आपल्या उत्कृष्ट अभिनयातून आपली वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, बॉलिवूडमधील काही अभिनेत्रींचे लग्न झाले. लग्नानंतर मुलंही झाली. त्यानंतर निर्मात्यांकडून कामाच्या मोठ्या ऑफरच आल्या नाहीत. तर काही अभिनेत्रींनी पूर्णवेळ आपल्या मुलांना सांभाळण्याचा निर्णय घेतला. ज्यांना लग्नानंतर मोठे सिनेमे मिळाले नाहीत किंवा मुलांच्या सांभाळासाठी त्यांनी सिनेमे केले नाहीत, अशा अभिनेत्रीबद्दल जाणून घेऊयात...


1. अनुष्का शर्मा 


बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने 11 डिसेंबर 2017 रोजी भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहली याच्याशी विवाह केला होता. नंतरच्या काळात तिला मोठ्या सिनेमांच्या ऑफर आल्याच नाहीत. तिने काही तुरळक सिनेमे केले आहेत. दरम्यान सध्याच्या घडीला अनुष्का मुलगी वामिकाचा सांभाळ करण्यात व्यस्त आहे. शिवाय, अनुष्का दुसऱ्यांदा आई होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरलाय. 


2. करिना कपूर 


करिना कपूर-खान म्हणजेच बॉलिवूडची बेबोने नुकतेच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केले आहे. तिने सैफ अली खानशी विवाह केला होता. त्यानंतर ती देखील तैमुर, जहांगीर यांचा सांभाळ करण्यात व्यस्त होती. सैफने करीनाशी दुसरा विवाह केला होता. करिनाच्यापूर्वी त्याने अमृतासिंह या अभिनेत्रीशी विवाह केला होता. मात्र, सैफशी करिनाचा विवाह झाल्यानंतर तिला हिट सिनेमांमध्ये काम करता आलेले नाही. 


3. शिल्पा शेट्टी 


अभिनेत्री शिल्पा शेट्टी अनेक कॉमेडी आणि अॅक्शन सिनेमांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. अक्षय कुमारपासून ते अनिल कपूर आणि गोविंदापर्यंत अनेक अभिनेत्यांबरोबर तिने काम केलं. मात्र, राज कुंद्राशी विवाह केल्यानंतर तिलाही मोठे सिनेमे मिळालेले नाहीत. सध्या ती इंडियन पोलिस फोर्स या रोहित शेट्टी दिग्दर्शित वेबसिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मात्र, लग्नानंतर हीट सिनेमे करण्यात ती अपयशीच ठरली. 


4. ऐश्वर्या रॉय


अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिने अभिषेक बच्चन याच्याशी 20 एप्रिल 2007 मध्ये विवाह केला होता. यानंतर ऐश्वर्यालाही मोठे सिनेमे करता आले नाहीत. तीही मुलांचा सांभाळ करण्यात व्यस्त झाली. ऐश्वर्याने बॉलिवूडमध्ये आजवर अनेक हिट सिनेमे केले आहेत. 


5. माधुरी दिक्षित 


माधुरी दिक्षितने 90 च्या दशकांपासून बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं. अनेक हिट सिनेमे केले. तेजाब पासून कोयलापर्यंत तिचे अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. मात्र, 17 ऑक्टोंबर 1999 रोजी तिने श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला. त्यानंतर माधुरीलाही हिट सिनेमे करता आले नाहीत. तिने विवाहानंतर अनेक वर्षांनी पहिला मराठी सिनेमा केला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Sana Javed : सना जावेद कोण आहे? जिच्याशी शोएब मलिकने तिसरं लग्न केलंय