Alia Ranbir Wedding : बॉलिवूड प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) आणि अभिनेता

  रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  यांचा विवाह सोहळा पाली हिल्स येथील वास्तू या घरामध्ये पार पडला. लग्न पार पडल्यानंतर आलियानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. या पोस्टला आलियानं कॅप्शन दिलं,"कुटुंब आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत आम्ही लग्नबंधनात अडकलो आहोत. आमच्या आयुष्यातील या खास दिवशी तुम्ही केलेल्या प्रेमाच्या वर्षावासाठी आभार". तिनं शेअर केलेल्या या पोस्टला रणबीरच्या एक्स गर्लफ्रेंड्स दीपिका पादुकोण  (Deepika Padukone)  आणि  कतरिना कैफचा (katrina kaif)  केलेल्या कमेंटनं अनेकांचे लक्ष वेधलं. 


दीपिका पादुकोणनं आलियानं शेअर केलेल्या फोटोला कमेंट केली, 'आयुष्यभर आनंदी राहा. तुम्हाला शुभेच्छा' तर कतरिनानं कमेंट केली, 'तुम्हा दोघांना शुभेच्छा, प्रेमाने आणि आनंदानं राहा'  






सात नव्हे तर केवळ चार फेऱ्यांमध्येच आलिया-रणबीरचा विवाह सोहळा संपन्न
मुलाखतीमध्ये राहुलनं सांगितलं, 'आलिया आणि रणबीरनं सात नाही तर चारचं फेरे घेतले. त्यांच्या लग्नाला विशेष पंडित हजर होते. हे पंडित गेली कित्येक वर्ष कपूर कुटुंबियांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. त्या पंडितांनी प्रत्येक फेऱ्याचे महत्व सांगितले. पण मी अशा  कुटुंबाचा सदस्य आहे जिथे अनेक धर्माचे लोक राहतात. रेकॉर्डसाठी सात फेरे नाहीत, तर चार फेरे झाले आणि चारही फेरे होत असताना मी तिथे उपस्थिती होतो.'


हेही वाचा :