Alia Ranbir Wedding : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता  रणबीर कपूर (Ranbir Kapoor)  आणि अभिनेत्री आलिया भट (Alia Bhatt) यांनी काल (15 एप्रिल) लग्नगाठ बांधली. मोजक्या लोकांच्या उपस्थितीत तसेच अगदी साध्या पद्धतीनं या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. त्यांच्या वास्तू या घरामध्ये हा लग्नसोहळा पार पडला असून त्यांच्या चाहते त्यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर शुभेच्छा दिल्या. आलियाच्या भावानं म्हणजेच राहुल भटनं (Rahul Bhatt) एका मुलाखतीमध्ये आलिया आणि रणबीरच्या विवाह सोहळ्याबाबत सांगितलं. त्यांनी सांगितलं की, आलिया आणि रणबीरनं सात नाही तर केवळ चारचं फेरे घेतले. याचे कारण देखील राहुलनं सांगितलं. 


मुलाखतीमध्ये राहुलनं सांगितलं, 'आलिया आणि रणबीरनं सात नाही तर चारचं फेरे घेतले. त्यांच्या लग्नाला विशेष पंडित हजर होते. हे पंडित गेली कित्येक वर्ष कपूर कुटुंबियांच्या कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहेत. त्या पंडितांनी प्रत्येक फेऱ्याचे महत्व सांगितले. पण मी अशा  कुटुंबाचा सदस्य आहे जिथे अनेक धर्माचे लोक राहतात. रेकॉर्डसाठी सात फेरे नाहीत, तर चार फेरे झाले आणि चारही फेरे होत असताना मी तिथे उपस्थिती होतो. '






रिसेप्शन होणार का?


लग्नाचे सर्व विधी आटोपल्यानंतर नीतू कपूर मुलगी रिद्धिमा आणि जावई भरत साहनीसोबत मीडियासमोर आल्या. त्यांनी पापाराझींचे आभार मानले आणि आलिया-रणबीरवर प्रेमाचा वर्षाव केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. याशिवाय त्यांना रिसेप्शनबाबत विचारण्यात आले असता, त्यांनी रिसेप्शन होणार नसल्याचे स्पष्ट केले. उलट त्या म्हणाल्या की, सगळं झालं आता तुम्ही आरामात घरी जाऊन झोपा.


हेही वाचा :