Ranbir Alia Wedding : बॉलिवूडमधील क्यूट कपल अशी ओळख असलेल्या  रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt)  यांचा विवाह सोहळा काही दिवसांपूर्वी पार पडला. मोजक्या पाहूण्यांच्या उपस्थितीमध्ये तसेच अगदी साध्या पद्धतीनं रणबीर आणि आलियाचा लग्नसोहळा पार पडला.  आलिया आणि रणबीरच्या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये रणबीरची आई नीतू कपूर यांनी लग्न सोहळ्याबद्दल सांगितलं. 


Film Companion ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नीतू कपूर यांनी प्रश्न विचारण्यात आला की, 'आलिया आणि रणबीरचा विवाह सोहळ्या साध्या पद्धतीनं का पार पडला?' यावर नीतू यांनी उत्तर दिलं, 'आम्हाला सर्कस सारखा विवाह सोहळा नको होता. आम्हाला याबाबत कोणालाही सांगायचे नव्हते. आम्ही शॉपिंग देखील केली नाही. काही लोकांना आम्ही काम करण्यास सांगितलं कारण जर आम्ही बाहेर गेलो असतो तर सर्वांना समजले असते की लवकर लग्न होणार आहे. जेव्हा  सब्यसाचे आऊटफिट आले तेव्हा सगळ्यांना कळाले. '





नीतू कपूर यांनी सांगतिले की रणबीर आलियाच्या लग्नाला 40 आणि रिसेप्शनला 40 पाहूणे उपस्थित होते. पुढे त्या म्हणाल्या, 'लग्नाचा सर्वात बेस्ट पार्ट वरात हा होता. आम्ही पाच ते सात फ्लोअरवर वरात केली. पॅसेजमध्येच आम्ही भांगडा केला. मला वाटत होतं की वरातीसाठी घोडी असवी पण जर घोडी आणली असती तर फोटोग्राफर आले आसते.'


हेही वाचा :