राहुल गांधी म्हणाले की, "काही राज्यांमध्ये धर्मनिरपेक्ष आघाड्या झाल्या आहेत. देशातल्या सर्व विरोथी पक्षांचे प्रमुख काम हे नरेंद्र मोदींना हरवण्याचे आहे. त्यामुळे संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र यावं लागेल."
आगामा काळातील काँग्रेसच्या अजेंड्याबाबत राहुल गांधी म्हणाले की, "आपल्याला संविधानाचे रक्षण करायचे आहे. भारतीय जनता पक्षापासून इथल्या संस्था आणि सामाजिक वारशाला वाचवायचे आहे. त्यासोबतच आपल्याला देशाचा विकास दर वाढवायचा आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करणे, नव्या नोकऱ्या निर्माण करणे, अन्याय आणि असमानता दूर करणे ही आपली आगामी काळातली कामं आहेत."