आदिवासी असल्यामुळं अशी वागणूक देता का? खर्गे न भेटल्याने माणिकराव गावितांचा संताप
एबीपी माझा वेब टीम | 30 Mar 2019 07:33 PM (IST)
माणिकराव गावित यांची नाराजी दूर करण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटण्यासाठी मुंबईला बोलावलं होतं. मात्र, भेट न होताच खर्गे निघून गेल्यानं गावित यांचा संताप अनावर झाला.
मुंबई : काँग्रेसमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते माणिकराव गावित यांची नाराजी दूर व्हावी म्हणून त्यांना अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. मात्र, भेट न होताच खर्गे निघून गेल्यानं गावित संतापले. आपण आदिवासी असल्यानं अशी वागणूक देता का असा सवालही त्यांनी यावेळी राज्यातील काँग्रेस नेत्यांना विचारला. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची समजूत काढली. VIDEO | मल्लिकार्जुन खर्गेंची भेट न झाल्याने माणिकराव गावित संतापले | मुंबई | एबीपी माझा आज काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनितीबाबत चर्चा झाली. यावेळी नाराज माणिकराव गावित यांची नाराजी दूर करण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांना भेटण्यासाठी मुंबईला बोलावलं होतं. मात्र, भेट न होताच खर्गे निघून गेल्यानं गावित यांचा संताप अनावर झाला. मी आदिवासी आहे म्हणून मला अशी वागणूक देता का? असा सवालही त्यांनी यावेळी राज्यातील काँग्रेस नेत्यांना विचारला. त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि हर्षवर्धन पाटील यांनी त्यांची समजूत काढून समाधान करण्याचा प्रयत्न केला.