Santosh Bangar : मतदारांना आणण्यासाठी फोन पे करून पैसे पाठवतो असं वक्तव्य कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी शहरामध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये केलं होतं. ही बातमी एबीपी माझाने लावून धरली होती. त्यानंतर निवडणूक आयोगाकडून आमदार संतोष बांगर यांना नोटीस बजावण्यात आली होती. त्या वक्तव्याप्रकरणी 24 तासात खुलासा सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्या वक्तव्याचा खुलासा आमदार बांगर यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केल्यानंतर आणि वक्तव्याचा व्हिडिओची तपासणी केल्यानंतर आज (20 ऑक्टोबर) निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिलेल्या सूचनेवरून गटविकास अधिकारी गणेश बोथीकर यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीनुसार आमदार संतोष बांगर यांच्या विरोधामध्ये कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एबीपी माझाच्या दणक्यानंतर बांगरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Continues below advertisement

तो व्हिडिओ माझाच आहे, पण एडिट करून आवाज लावलेला दिसतो 

दरम्यान, संतोष बांगर यांनी काल (20 ऑक्टोबर) एबीपी माझाशी बोलताना सांगितले की मी कोणतीही वक्तव्य केलेली नाही. ती विरोधकांनी तयार केलेली कॉपी आहे. त्यामुळे माझ्या विरोधात जे काही झालं आहे ते सर्व चुकीचं आहे. विरोधकांकडे काही काम राहिलेलं नाही, असा आरोप त्यांनी केला. आपल्याला निवडणूक आयोगाकडून नोटीस आलेली नाही. नोटीस आल्यानंतर नंतर सुद्धा हाच खुलासा करणार असल्याचे संतोष बांगर म्हणाले. तो व्हिडिओ माझाच आहे, पण एडिट करून आवाज लावलेला दिसतो असा दावा सुद्धा संतोष बांगर यांनी केला. ते पुढे म्हणाले की फोन पे चा अर्थ मला माहित नाही. गुगल पे सुद्धा मला माहित नसल्याचे संतोष बांगर यावेळी म्हणाले. 

संतोष बांगर कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार

विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Elections) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. हिंगोली जिल्ह्यात देखील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर होण्याअगोदरच आमदार संतोष बागर (Santosh Bangar) यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख फिक्स करण्यात आली आहे. येत्या 24 तारखेला आमदार संतोष बांगर कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. संतोष बांगर हे सध्या शिवसेना शिंदे गटात आहेत. शिवसेनेते फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला होता. ते सातत्यानं त्यांच्या वेगवेगळ्या वक्त्व्यांमुळं चर्चेत असतात. अशातच आता त्यांनी बाहेरगावच्या मतदारांना आणण्यासाठी फोन पे करण्याची भषा केली आहे. त्यामुळं सर्वत्र त्यांच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे. मतदारांना अमिष दाखवण्याचा हा प्रकार असल्याचे बोलले जात आहे.

Continues below advertisement

इतर महत्वाच्या बातम्या