Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election 2024) महाराष्ट्रामध्ये भाजपला जोरदार फटका बसला. महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) जोरदार मुसंडी मारत यश मिळवले. एनडीएला 19 जागा मिळाल्या तर भाजपने फक्त 9 जागांवर यश संपादन केले. महायुतीच्या (Mahayuti) पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मला सरकारमधून मोकळं करावे, अशी विनंती मी नेतृत्वाकडे करणार असल्याचे वक्तव्य केले आहे. आता यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून आता विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोला लगावला आहे. 


लोकसभा निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. मुंबईच्या अध्यक्षांनी स्वतः लक्ष घातलं. जो पराभव झाला त्याची सर्व जबाबदारी माझी आहे. सर्व जबाबदारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) स्वीकारत आहे. आता मला विधानसभेसाठी पूर्ण उतरायचं आहे. मला सरकारमधून मोकळ करावं, अशी मी विनंती करणार आहे. बाहेर राहिलो तरी मी काम करीन. पण मला आता पूर्णवेळ विधानसभेकडे लक्ष केंद्रीत करायचं आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. 


⁠विरोधी पक्षाला फडणवीसांनी खिळखिळं केलंय 


विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे मोठे नेते आहेत. ⁠जिगरबाज नेते आहेत. त्यांनी पळून जावू नये. राज्यात ⁠22 जागांवरुन त्यांनी 9 जागेवर भाजपला आणले आहे. लोकसभेला जो निकाल आला तसाच निकाल विधानसभेला येईपर्यंत त्यांनी थांबावे. ⁠ते पळून जाणारे नेते नाहीत.⁠ दोन पक्षांच्या जिवावर ते सरकार बनवून ते काम पाहत आहेत. त्यांनी अद्याप निर्णय घेतला नाही. ⁠विरोधी पक्षाला त्यांनी खिळखिळं केलंय, असा खोचक टोला त्यांनी यावेळी लगावला आहे. 


लोकसभा निवडणुकीत कोणाला किती  जागांवर विजय मिळाला?


देशपातळीवरील समीकरणं


एनडीए आघाडी- 294


इंडिया आघाडी- 232


इतर-17


महाराष्ट्रातील खासदारांचे पक्षीय बलाबल


महाविकास आघाडी- 29


महायुती- 18


अपक्ष- 1


महायुतीमधील पक्षीय बलाबल


भाजप- 9


शिवसेना (शिंदे गट)-7


राष्ट्रवादी काँग्रेस-1


महाविकास आघाडीत कोणाला किती जागा?


काँग्रेस- 13


ठाकरे गट-9


शरद पवार गट-8


आणखी वाचा 


राज्यात महायुतीची पिछेहाट, फडणवीसांची मुक्त करण्याची विनंती; अजित पवार गटाचे सुनील तटकरे काय म्हणाले?