एअर स्ट्राईकमुळं देशातलं वातावरण चांगलं, मोदी पुन्हा पंतप्रधान होतील : आठवले
एबीपी माझा वेब टीम | 03 Mar 2019 09:03 PM (IST)
'भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकमुळं देशातील वातावरण चांगलं असल्यानं 2019 ला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील', असं वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.
नाशिक : 'भारतानं पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईकमुळं देशातील वातावरण चांगलं असल्यानं 2019 ला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील', असं वक्तव्य केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केलं आहे. नाशिक येथे पत्रकारांशी बोलताना आठवले म्हणाले, "येत्या लोकसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष भाजप-शिवसेनेसोबत राहिला तर 42-43 जागा निवडून येतील अशी परिस्थिती आहे. सर्जिकल स्ट्राईक, एअरफोर्सचा जैश-ए-मोहम्मदवरील अटॅक यामुळे देशातील वातावरण अत्यंत चांगलं आहे. मला असं वाटतं की 2019 ला नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान होतील आणि एनडीएचं सरकार अत्यंत ताकतीने या देशात आल्याशिवाय राहणार नाही". व्हिडीओ :