Dhule News: शिरपूर तालुक्यातील वाडी खुर्द येथील उमेश राजेंद्र पाटीव वय 22 या तरुणाने तापी पुलावरून उडी घेऊन तापी नदीपात्रात आत्महत्या केली. शनिवारी सायंकाळच्या सुमारास हि घटना उघडकीस आली. उमेश पाटील हा घरातील एकुलता एक मुलगा होता. तो रोजगारानिमित्त सुरत येथील एका कंपनीत काम करत होता. यात्रेनिमित्त दोन दिवसांपूर्वीच तो आपल्या गावी वाडी खुर्द येथे आला होता. आत्महत्येपूर्वी उमेशने इन्स्टाग्रामवर ‘गुड बाय’ असा तापी नदीसोबतचा स्वतःचा सेल्फी फोटो स्टेटस ठेवल्याचे समोर आले आहे. मात्र, आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. तर या घटनेने मात्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पुढील तपास सुरु केलाय.

Continues below advertisement

बोगस मतदानासाठी आलेल्या 174 महिलांवर गुन्हे दाखल

अंबरनाथमध्ये एका सभागृहात बोगस मतदानासाठी शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराने 200 पेक्षा जास्त महिला आणल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपा केला होता. दरम्यान पोलिसांनी या सगळ्या महिलांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली. या प्रकरणी 174 महिलांवर अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आलाय. तर यातील काही मुली या अल्पवयीन असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अंबरनाथ पोलिसांनी मतदानावर प्रभाव टाकण्यासाठी केलेली बेकायदेशीर गर्दी, बोगस कागदपत्रांच्या आधारे मतदान करण्याची तयारी या कालमांतर्गत गुन्हे दाखल केलेत.

Continues below advertisement

बोगस मतदानासाठी आणण्यात आलं होतं, यामागचा सूत्रधार कोण?

दरम्यान या महिला भिवंडी येथील शांतीनगर परिसरातून बोगस मतदानासाठी आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र महिलांना भिवंडी येथून कोणाच्या सांगण्यावरून बोगस मतदानासाठी आणण्यात आलं होतं, यामागचा सूत्रधार कोण? याचा सखोल तपास अंबरनाथ पोलीस करत आहेत. या महिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आलं आहे. मात्र या महिलांचे भिवंडीचे जे कनेक्शन आहे त्या संदर्भात सखोल तपास करून जी माहिती पुढील त्याप्रमाणे कारवाई केली जाईल, शिवाय ज्या कृष्णा मॅरेज हॉलमध्ये ह्या सगळ्या महिला थांबल्या होत्या, ते शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार कृष्णा रसाळ यांच्यावर देखील कारवाई केल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.

ही बातमी वाचा: