Pradhan Mantri Kisan Samman Nidhi : शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सरकारने विविध योजना आणल्या आहेत. यातीलच एक योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi). गेल्या पाच वर्षापासून पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या माध्यमातून केंद्र सरकारनं 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2.81 लाख कोटी रुपये पाठवले आहेत. आता पुन्हा 28 फेब्रुवारीला केंद्र सरकार पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 हजार कोटी रुपये जमा करणार आहे.


पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र सरकारने गेल्या 5 वर्षांत 11 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 2.81 लाख कोटी रुपये पाठवले आहेत. ही रक्कम शेतकऱ्यांना विविध हप्त्यांमध्ये योजनेंतर्गत देण्यात आली आहे. आता पुन्हा 28 फेब्रुवारीला केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 21 हजार कोटी रुपये जमा करणार आहे. वास्तविक, 16 व्या हप्त्याची रक्कम पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांना द्यायची आहे आणि पीएम मोदी महाराष्ट्रातील यवतमाळमधून डीबीटीद्वारे ही रक्कम शेतकऱ्यांना देणार आहेत.


शेतकऱ्यांची संख्या वाढली


पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रातील यवतमाळमधून PM किसान योजनेचा 16 वा हप्ता जारी करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 फेब्रुवारी 2024 रोजी पीएम किसानचा 16 वा हप्ता हस्तांतरित करतील. याअंतर्गत 9 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात 21 हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा केली जाणार आहे. यापूर्वी, 15 वा हप्ता PM मोदींनी गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर 2023 रोजी खुंटी, झारखंड येथून जारी केला होता. त्यानंतर 8.11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 18.61 हजार कोटी रुपये जमा करण्यात आले. त्यानुसार 16 वा हप्ता घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे.


5 वर्षात शेतकऱ्यांना 2.81 लाख कोटी रुपये 


पीएम किसान सन्मान निधी योजना 2019 मध्ये सुरू झाली होती. गेल्या 5 वर्षात सर्व लाभार्थी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेद्वारे वार्षिक 6000 रुपयांची आर्थिक मदत दिली जात आहे. योजनेअंतर्गत आतापर्यंत 11 कोटींहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर 2.81 लाख कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत. पीएम किसान योजना शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करते आणि ते त्यांची शेती आणि कृषी क्रियाकलाप सुधारण्यास सक्षम आहेत. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये देते. पीएम किसान योजनेंतर्गत, प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर 3 वेळा प्रत्येकी 2,000 रुपये पाठवले जातात.


महत्वाच्या बातम्या: