Mango Production : आंबा (Mango) म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. कारण आंबा हे सर्रास सगळ्यांच्याच आवडीचं फळ आहे. आंब्याला फळांचा राजा असंही म्हणतात. सध्या आंब्याचा हंगाम सुरु झाला आहे. विविध ठिकाणच्या बाजारात आंबा दाखल होत आहे. मात्र, सुरुवातीचा काळ असल्यानं आंब्याची आवक कमी आहे, त्यामुळं बाजारात आंब्याच्या दरात सध्या तेजी पाहायला मिळतेय. दरम्यान, देशात सर्वात राज्यात आंब्याच उत्पादन कोणत्या राज्यात होतं? याबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात आंबा उत्पादनात अग्रेसर असणाऱ्या राज्य कोणती? 


लोक आंब्याचा वेगवेगळा उपयोग करतात. फळ म्हणून आंबा खातात. त्याचबरोर रसापासून ज्यूस करतात. तसेच आंब्याची चटणी, लोणचेही तयार केले जाते. तसेच आंबा आरोग्यासाठी देखील चांगला आहे. दरवर्षी देशात मोठ्या प्रमाणात आंब्याचं उत्पादन होतं. भारतातून अनेक देशात आंब्याची निर्यातही केली जाते. 


आंबा उत्पादनात अग्रेसर असणारी पाच राज्य कोणती? 


उत्तर प्रदेश आंबा उत्पादनात प्रथम क्रमांकावर


भारत देशात सर्वात जास्त आंब्याचे उत्पादन हे उत्तर प्रदेशात होते. उत्तर प्रदेशमधील वातावरण आंबा उत्पादनासाठी पोषक आहे. तेथील माती आणि पाणी आंब्याच्या बागांसाठी चांगले आहे. त्यामुळं देशात सर्वात जास्त आंब्यात उत्पादन तिथं होतं. देशाच्या एकूण आंबा उत्पादनात 20.85 टक्के उत्पादन हे एकट्या उत्तर प्रदेशमध्ये होतं. दरवर्षी मोठ्या प्रमाणात आंब्याची निर्यातही उत्तर प्रदेशमधून केली जाते. 


आंध्र प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर 


आंबा उत्पादनात उत्तर प्रदेशनंतर आंध्र प्रदेशचा दुसरा क्रमांक लागतो. आंध्र प्रदेशात देखील मोठ्या प्रमाणात आंब्याचं उत्पादन घेतलं जातं. आंध्र प्रदेशचा आंबा सुगंध आणि गोड चवीसाठी ओळखला जातो. देशाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी 20.04 टक्के उत्पादन हे एकट्या आंध्र प्रदेशात होतं. 


बिहार तिसऱ्या क्रमांकावर


आंबा उत्पादनात उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशनंतर बिहारचा तिसरा क्रमांक लागतो. देशातील एकूण आंबा उत्पादनापैकी  11.19 टक्के उत्पादन हे एकट्या बिहारमध्ये होतं.


कर्नाटक चौथ्या क्रमांकावर 


बिहारनंतर आंबा उत्पादनात कर्नाटक राज्याचा चौथा क्रमांक लागतो. देशातील एकूण उत्पादनापैकी कर्नाटक राज्यात 8.06 टक्के उत्पादन होते.


तामिळनाडू आंबा उत्पादनात पाचव्या स्थानी


कर्नाटकनंतर आंबा उत्पादनात तामिळनाडू राज्याचा क्रमांक लागतो. तामिळनाडू आंबा उत्पादनात पाचव्या स्थानी आहे. येथील शेतकरी दरवर्षी 5.65 टक्के आंब्याचे उत्पादन घेतात.   


पाच राज्यात मिळून  65 टक्के आंबा उत्पादन


दरम्यान, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि तामिळनाडू या पाच राज्यात देशाच्या एकूण आंबा उत्पादनापैकी 65 टक्के उत्पादन होते. म्हणजे फक्त 35 टक्के आंब्याचे उत्पादन हे इतर राज्यात घेतलं जातं. महाराष्ट्रात देखील आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतलं जातं. कोकण विभागा आंबा उत्पादनात आघाडीवर आहे. दरम्यान, पहिला पाच राज्यात महाराष्ट्राचा नंबर लागत नाही. आंबा हा आरोग्याच्या दृष्टीनं देखील खूप फायदेशीर आहे. आंब्यात मुबलक प्रमाणात जीवनसत्ते असतात. 


महत्वाच्या बातम्या:


युवराज सिंहची अनोखी शेती, 26 जातींच्या आंब्याची लागवड, ऑनलाइन विक्रीतून कमावले लाखो रुपये