Bank News : अनेकवेळा बँका (Bank) विनाकारण तुमच्या खात्यातून पैसे कट करतात. मग तुमचे खाते  मायनसमध्ये जाते. यानंतर खाते बंद करण्याशिवाय ग्राहकांकडे कोणताही पर्याय उरत नाही. पण तुम्ही खाते बंद करण्यासाठी गेलात तर बँक अधिकारी (Bank Officer) तुमचे खाते बंद करत नाहीत, कारण उणे रक्कम तुम्हाला क्लिअर केल्यानंतरच तुमचे खाते बंद होऊ शकते, असे सांगतात. जर तुम्हालाही अशाच समस्येचा सामना करावा लागत असेल तर यावर नेमकं काय करता येईल? याबाबतची माहिती आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


सतत बँकेचे व्यवहार करणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. अनेक बँका तुम्हाला न कळवता तुमच्या खात्यातून पैसे कट करतात. अशा परिस्थितीत तुम्ही बँकेकडे तक्रार करु शकता. तुम्हाला माहिती आहे का की जर तुमच्या खात्यात शून्य शिल्लक असेल तर बँक त्याला मायनस करू शकत नाही. असे झाल्यास तुमच्याकडे एक पर्याय आहे. त्याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आजकाल सर्वजण बचत बँक खात्याला प्राधान्य देतात. बचत खाते उघडताना, बँक आपल्या ग्राहकांना अटी आणि शर्ती सांगते की बँक खाते उघडल्यानंतर त्यांना खात्यात किमान शिल्लक राखावी लागेल. किमान शिल्लक मर्यादा देखील बँकेनेच ठरवली आहे. जर ग्राहकाच्या खात्यात किमान शिल्लक नसेल तर त्याऐवजी दंड आकारला जातो.


RBI चा नियम काय सांगतो?


आरबीआयच्या नियमांनुसार, किमान शिल्लक नसतानाही बँक ग्राहकांच्या खात्यातून पैसे कापू शकत नाही. त्याचवेळी, दंडाच्या नावाखाली कपात करुन बँक ग्राहकांचे खाते नकारात्मक करू शकत नाही. तरीही कोणत्याही बँकेने असे केल्यास ग्राहक आरबीआयकडे जाऊन बँकेची तक्रार करू शकतात. तुमच्या तक्रारीच्या आधारे, RBI त्या बँकेवर कारवाई करेल. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही RBI च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तक्रार नोंदवू शकता. आजकाल असे होत असताना त्या बँकेकडे तक्रार करूनही त्यावर उपाय मिळू शकतो. अनेक वेळा बँका नंतर रक्कम परत करतात. तुम्हाला फक्त त्यांच्या कस्टमर केअरशी बोलून तुमची समस्या सांगायची आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


बँकांमध्ये तब्बल 12 हजार 779 कोटी रुपये पडून, हे पैसे नेमके कोणाचे?