Astro Tips : लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावी असे वाटत असेल तर काही वाईट सवयी दूर करणे आवश्यक आहे. एखाद्या व्यक्तीला वाईट सवयी असतात. या वाईट सवयींमुळे एखादा माणून गरीब होता. कोणत्याही व्यक्तीच्या चांगल्या किंवा वाईट सवयी त्याच्या कुंडलीत उपस्थित ग्रहांची स्थिती बदलतात. चांगल्या सवयी ग्रहांना बळ देतात आणि वाईट सवयी ग्रह कमकुवत करण्याचे काम करतात. त्यामुळे लक्ष्मीची कृपा मिळविण्यासाठी आपल्या वाईट सवयींकडे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. काही वाईट सवयी आहेत, ज्यामुळे खूप प्रयत्न करूनही यश मिळत नाही आणि पैशांशी संबंधित समस्या नेहमीच राहतात. अशा वेळी तुमच्या थोड्याशा निष्काळजीपणामुळे तुम्हाला गरिबीला सामोरे जावे लागू शकते. चला अशा सवयींबद्दल जाणून घेऊया. 


पाय हलवण्याची सवय
तुम्हाला बसताना पाय हलवण्याची सवय असेल तर ही सवय सोडा. कारण अशा लोकांच्या मनात सतत काही ना काही गोष्टी फिरत राहतात. अशा लोकांचा चंद्र कमजोर असतो. 


अस्वच्छता  
तुमच्या आजूबाजूला घाण अजिबात होऊ देऊ नका. घाण नकारात्मकता आणते आणि लक्ष्मीजी कोपतात.  त्यामुळे आपल्या सभोवतालची स्वच्छता नियमितपणे ठेवा जेणेकरून जीवनात सुख-समृद्धी टिकून राहते.


नखे चावणे
जर तुम्हालाही नखे चघळण्याची सवय असेल तर ती ताबडतोब बदला. कारण नखे चावल्याने व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य ग्रह कमजोर होतो आणि व्यक्तीच्या मान-सन्मान, आरोग्य आणि कामावर चुकीचा परिणाम दिसून येतो.


पाय घासत चालणे
तुम्हीही पाय घासत चालत असाल तर ही सवय अत्यंत चुकीची आहे. याचा वाईट परिणाम व्यक्तीच्या वैवाहिक जीवनावर होतो. इतकंच नाही तर तुम्हाला परस्पर वैमनस्यही सहन करावं लागतं.


विखुरलेले स्वयंपाकघर
स्वयंपाकघरात अशा प्रकारे पसरलेल्या वस्तू ठेवल्या तर ते आर्थिक संकटाचे कारण बनते. स्वयंपाकघरात वस्तू व्यवस्थित न ठेवल्यास घरात गरिबी राहते.


पादत्राणे
शूज आणि चप्पल कधीही घरात इकडे तिकडे पसरून ठेवू नका. याचा व्यक्तीच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो. व्यक्ती करत असलेले काम बिघडू लागते आणि कामात अपयशच येते.


जनावरांना खायला देऊ नका
जर तुम्ही पशु-पक्ष्यांना खाऊ घालत नसाल तर आजपासूनच त्यांना खायला द्यायला सुरुवात करा, कारण प्राण्यांना अन्न खायला दिल्याने कुंडलीतील अशुभ ग्रह शुभ परिणाम देऊ लागतात आणि बुध ग्रहही बलवान होतो. त्यामुळे करिअरमधील अडथळे दूर होतात. 


महत्वाच्या बातम्या


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्त्वाच्या बातम्या :