Samudrik Shastra : काही लोकांच्या एका सहा बोटे असतात. ज्योतिषशास्त्रात ज्यांना सहा बोटे असतात त्यांना शुभ मानले जाते. सहा बोटे असणारे लोक खूप भाग्यवान असतात. असे लोक पाच बोटांच्या लोकांपेक्षा जास्त बुद्धिमान असतात. जाणून घेऊया अशा व्यक्तींचे व्यक्तिमत्व कसे असेल.


ज्यांच्या हाताला किंवा पायाला सहा बोटे असतात असे लोक नेहमी इतरांच्या कामात दोष शोधतात. त्यामुळे कधीकधी त्यांचे इतर लोकांशी संबंध बिघडतात.
ज्या लोकांच्या हाताच्या किंवा पायाच्या करंगळीला 1 अतिरिक्त बोट जोडलेले असते, त्यांच्यावर बुध पर्वताचा प्रभाव असतो आणि अंगठ्याला जोडलेल्या बोटावर शुक्र पर्वताचा प्रभाव असतो.
बुध ग्रहाच्या प्रभावामुळे हे लोक खूप बुद्धिमान असतात. कुशाग्र मनामुळे हे लोक प्रत्येक क्षेत्रात यश मिळवतात.
या लोकांची काम करण्याची क्षमता इतर लोकांपेक्षा चांगली असते. हे लोक सर्वकाही चांगले करतात.
या लोकांचे मन खूप वेगाने धावते. हे लोक आपले काम पूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे करतात.
असे लोक चांगले समीक्षकही असतात. यामुळे, लोक कधीकधी त्यांना आवडत नाहीत.
शुक्राच्या प्रभावामुळे हे लोक खूप कलाप्रिय आणि शौकीन असतात. 
या लोकांना नवीन ठिकाणी फिरायला खूप आवडते. अशा व्यक्ती खूप मेहनत आणि प्रामाणिकपणाने पैसा कमावतात आणि हा पैसा आरामदायी जीवन जगण्यात खर्च करतात. इतरांना आकर्षित करून घेण्याची या लोकांकडे शक्ती असते. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 


महत्वाच्या बातम्या: