Geeta Gyan : श्रीमद्भागवत गीतेत भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणुकीचे वर्णन केले आहे. गीतेची ही शिकवण श्रीकृष्णाने अर्जुनाला महाभारत युद्धात दिली होती. गीतेत दिलेली शिकवण आजही तितकीच समर्पक आहे आणि माणसाला जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवते. असे म्हटले जाते की, गीतेतील वचने जीवनात अंगीकारल्याने माणसाची खूप प्रगती होते. गीता हा एकमेव धर्मग्रंथ आहे जो मानवाला जगण्याचा मार्ग दाखवतो. गीता जीवनातील धर्म, कर्म आणि प्रेमाचा धडा शिकवते. श्रीमद भागवत गीतेचे ज्ञान मानवी जीवन आणि जीवनानंतरचे जीवन या दोन्हीसाठी उपयुक्त मानले जाते. गीता हे जीवनाचे संपूर्ण तत्वज्ञान आहे आणि त्याचे पालन करणारी व्यक्ती सर्वश्रेष्ठ असते, असे म्हटले जाते.  गीतेमध्ये श्रीकृष्णाने सांगितले आहे की कोणत्या लोकांचे रक्षण भगवंत स्वतः करतात. चला जाणून घेऊया अशा लोकांबद्दल.  


गीतेत लिहिले आहे की, ज्याच्या मनात फक्त भगवंतच वास करत असतो आणि प्रत्येक क्षण भगवंताचा विचार करण्यात मग्न असतो, त्याला खरा भक्त म्हणतात. सतत भगवंताशी जोडलेल्या अशा भक्तांचे रक्षण भगवंतच करतात.


श्रीकृष्ण गीतेमध्ये सांगतात की, जर एखाद्या व्यक्तीमध्ये नम्रतेची भावना नसेल तर त्याला यश मिळणे व्यर्थ आहे. यशासाठी व्यक्तीने नम्र असणे आवश्यक आहे.


श्रीकृष्ण सांगतात की, आपल्या जीवनाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय आपण स्वतःच घेतले पाहिजेत. कारण त्यामुळे व्यक्तीला नंतर पश्चाताप होत नाही.


गीतेत सांगितले आहे की, माणसाने स्वतःला तामसिक आणि संयमी आहारापासून दूर ठेवावे. अशा आहारामुळे मनात चंचलता आणि सदोष विचार निर्माण होतात, त्यामुळे विचार विकृत होतो.


भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितले आहे की, मोठ्या आणि महान गोष्टी वेळ आणि परिश्रमाने साध्य होतात. शंका घेणाऱ्या लोकांना यश मिळत नाही. दृढ विश्वास ठेवणारा आणि दृढ निश्चयाने समृद्ध व्यक्तीच यशस्वी होऊ शकतो. म्हणूनच मनात कधीही संशय नसावा.


प्रत्येक काम करण्याचा नियम असावा. कोणतेही काम नियमितपणे एकाच वेळी केल्याने त्याची सवय होऊन जाते. वेळ पाळली तरच कोणतीही साधना सफल होते.  


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


संबंधित बातम्या


 Shani Gochar 2023 : 'या' राशींवर 26 महिने शनिची वक्रदृष्टी राहणार, 'या' गोष्टींची घ्या काळजी