एक्स्प्लोर

Chanakya Niti : आयुष्यात नेहमीच जाणवते पैशांची तंगी; 'या' 3 स्वभावाच्या व्यक्तींवर लक्ष्मी कधीही प्रसन्न होत नाही, चाणक्य सांगतात...

Chanakya Niti : या ठिकाणी आचार्य चाणाक्य यांनी अशा काही वाईट सवयींविषयी सांगितलं आहे ज्या अंगिकारल्यास आपल्याला आयुष्यभर धनहानीचा सामना करावा लागू शकतो.

Chanakya Niti : आचार्य चाणाक्य (Chanakya Niti) यांना भारतातीतल अत्यंत बुद्धिमानी अर्थशास्त्रज्ञ मानतात. त्यांनी आपल्या आयुष्यात मानवाच्या हिताशी संबंधित अनेक नीती तसेच, तत्त्वमूल्ये सांगितली आहेत. तसेच, त्यांनी सांगितलेली नीतिमूल्ये आजही समाजात आचरणात आणली जातात. काही त्यांच्या मार्गदर्शनातून आपल्याला चांगली शिकवण मिळते, तर काहींमधून आपल्याला जीवनाचं कटू सत्य कळतं. 

या ठिकाणी आचार्य चाणाक्य यांनी आपल्या नीतिशास्त्रात माणसांच्या काही चांगल्या स्वभावाची आणि सवयींची उदाहरणं दिली होती ज्यामुळे व्यक्ती धनवान होतो. त्याचप्रमाणे, या ठिकाणी त्यांनी अशा काही वाईट सवयींविषयी सांगितलं आहे ज्या अंगिकारल्यास आपल्याला आयुष्यभर धनहानीचा सामना करावा लागू शकतो. या सवयी नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात. 

इतरांवर अवलंबून असणं 

चाणाक्यांच्या म्हणण्यांनुसार, जी व्यक्ती आपली कामं स्वत:करण्याऐवजी इतरांवर अवलंबून असतात, ज्या व्यक्ती आत्मनिर्भर नसतात असे लोक आयुष्यात कधीच धनवान होऊ शकत नाहीत. अशा लोकांना आयुष्यभर संघर्ष आणि आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. तसेच, जे लोक आपली कामं इतरांवर लादतात ते कोणत्याच कार्याच्या बाबतीत सतर्क नसतात. असे लोक कामाच्या ठिकाणी अपयशी ठरवले जातात. त्यामुळेच आपली कामं इतरांवर लादण्याऐवजी स्वत: करण्याचा प्रयत्न करा. 

वाणीत कटुता 

चाणक्य म्हणतात की, कठोर आणि कटू वाणी आपलं भाग्य अधिक कमजोर करतात. ज्या लोकांच्या बोलण्यात गोडवा नसतो त्यांच्यापासून लोक हळुहळू अंतर ठेवतात. असे लोक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागे पडतात. ज्यांची वाणी कठोर आणि कटू असते त्यांचं भाग्य देखील तितकंच कमजोर असतं. चाणक्यांच्या म्हणण्यांनुसार, ज्यांची वाणी कठोर असते त्यांच्यावर कधीच देवी लक्ष्मीची कृपा नसते. यासाठीच वाणीत गोडवा असावा. मित्र-मैत्रीणींशी सलोख्याने वागावं. यामुळे जीवनात तुमची प्रगती दिसून येईल. 

आळशी लोक 

चाणाक्य नीतित आळस हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू मानण्यात आला आहे. जे लोक आजचं काम उद्यावर ढकलतात त्यांची आयुष्यात कधीच प्रगती होत नाही. आळस हा व्यक्तीची क्षमता आणि वेळ नष्ट करुन टाकतो. परिणामी, अशा लोकांना आयुष्यात आर्थिक संकटातून बाहेर येण्यास खूप त्रास होतो. यासाठी आजपासूनच आळसावर मात करण्याचा प्रयत्न करा. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)  

हेही वाचा : 

Akshaya Tritiya 2026 : अक्षय्य तृतीयेच्या दिवशी जुळून येतोय अक्षय्य योग; 4 राशींचं नशीब पालटणार, पदरात पडणार फक्त पुण्य

महत्त्वाच्या बातम्या

Hartalika and Ganesh Chaturthi : यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी! मग उपवास कसा सोडायचा? जाणून घ्या सविस्तर...
Shravan 2026 : श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
श्रावणापासून ते कार्तिकपर्यंत चुकूनही खाऊ नका 'या' 4 गोष्टी; अन्यथा...आरोग्य आणि ग्रहांवर पडू शकतो परिणाम  
Shravan 2026 : श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
श्रावण महिन्यात दानधर्म करताय? 'या' 5 गोष्टींवर प्रसन्न होतात महादेव...तुम्हीही श्रावणात या वस्तू दान केल्यात?
Weekly Horoscope : कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य
कुंभ आणि मीन राशींना ऑगस्टच्या नवीन आठवड्यात घडणार मोठ्ठ्या घडामोडी; फक्त 'ही' गोष्ट टाळा, साप्ताहिक राशीभविष्य

व्हिडीओ

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पाऊस लय भारी... गाठली सरासरी Special Report
Sharad Pawar MP Will Meet Pm Modi : भेटीगाठींचा सिलसिला, पवारांचा काय फैसला? Special Report
Raj Thackeray PC : कोकणातले खड्डे, जमिनीची विक्री, कंत्राटदारते नितीन गडकरी, राज ठाकरेंची FULL PC
Prashant Damle Majha Katta : रंगभूमीवर महाविक्रम, कधीही न ऐकलेले किस्से, प्रशांत दामलेंचा ‘माझा कट्टा’
Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
मनोज जरांगे पाटलांची बावनकुळेंवर व्यंगात्मक टीका; म्हणाले, हडप्पा संस्कृती अन् अजंठा लेणीप्रमाणे दिसणारा प्राणी
Sarfaraz Khan: अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा, साई सुदर्शनच्या जागी संधी
अखेर सरफराज खानसाठी टीम इंडियाची दारं पुन्हा उघडली, बीसीसीआयची मोठी घोषणा
IND vs SL XI : 6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले, श्रीलंकेच्या खेळाडूंनी थेट बॅट तपासली
6,6,6... सिराजचा सराव सामन्यात धमाका, विजयासाठी एका ओव्हरमध्ये 16 धावांची गरज असताना तीन षटकार मारले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
जयंत पाटील अन् देवेंद्र फडणवीसांचा एकाच विमानातून प्रवास; काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया, हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
नालासोपाऱ्यात कोयत्याने पिता-पुत्रावर जीवघेणा हल्ला; मुलाची प्रृकती गंभीर, वडिलही थोडक्यात बचावले रुग्णालयात उपचार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 9 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Devendra Fadnavis: 'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
'मी 100 टक्के ज्या अडचणी असतील त्या सोडवतो, पण कोल्हापूरची हद्दवाढ झालीच पाहिजे..' सीएम फडणवीसांनी व्यासपीठावरून ठणकावलं, बाॅल थेट लोकप्रतिनिधींच्या कोर्टात टाकला
Embed widget