Astrology : प्रेमात सतत अडथळे किंवा अडचणीची परिस्थिती आली की मानसिक तणाव वाढतो. प्रत्येक गोष्टीवर परिणाम झालेला दिसतो. अनेक वेळा माणसाला समजत नाही की त्याने काय करावे? जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती उद्भवू लागते तेव्हा त्याचे परिणाम कधीकधी भयानक असतात. त्यामुळे यावर वेळीच उपाय करायला हवा.

ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा मानवावर विशेष प्रभाव पडतो. एखाद्या व्यक्तीच्या यश-अपयशात ग्रहांचे शुभ-अशुभ महत्त्व महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा ग्रह अशुभ असतात तेव्हा व्यक्तीला त्रास आणि अडथळ्यांचा सामना करावा लागतो. जीवनात अशी परिस्थिती उद्भवू लागते, तेव्हा उपाययोजना करणे आवश्यक होते.

पाप आणि क्रूर ग्रह प्रेम संबंधांमध्ये अडथळा आणतात. कुंडलीचे पाचवे घर आपले प्रेम संबंध दर्शवते. त्यावर शुभ आणि सौख्य ग्रहांचा प्रभाव पडला की, व्यक्तीला खरे प्रेम मिळते. लव्ह पार्टनरची पूर्ण साथ मिळेल. प्रेमात यश मिळते. एवढेच नाही तर लव्ह पार्टनर तुमचे नशीबही वाढवतो. पण जेव्हा कुंडलीच्या या घरावर एखादा अशुभ ग्रह किंवा क्रूर ग्रह येतो तेव्हा प्रेम संबंधात नेहमीच काही ना काही अडथळे येतात. प्रेमातही यश मिळत नाही.

शनिदेवाला ज्योतिषशास्त्रात क्रूर ग्रह मानले जाते. यासोबतच राहू केतू हा पाप ग्रह असल्याचे म्हटले आहे. जेव्हा यापैकी कोणताही ग्रह कुंडलीच्या पाचव्या भावात असतो तेव्हा प्रेमात अडथळे येऊ लागतात.

श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. हा महिना भगवान शिवाला समर्पित आहे. विशेष म्हणजे हे तीन ग्रह भगवान शंकराच्या पूजेने लवकर शांत होतात. त्यामुळे श्रावण महिन्याला खूप महत्त्व आहे. अशा समस्यांचा सामना करणाऱ्यांसाठी श्रावण महिना खास असतो. शनिदेवाची विधिवत पूजा केल्याने शनि शांत होतो. शिवाय श्रावण सोमवारी भगवान शंकराची पूजा केल्याने राहू केतूला शांती मिळते.  

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. यासाठी संबंधित तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा.) 

महत्वाच्या बातम्या :