Cashew Nut Processing Plant : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मोहाडीत सह्याद्री फार्म्समध्ये (Sahyadri Farmer Producer Company) राज्यातील सर्वात मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प (Cashew Nut Processing Plant) उभारला आहे. प्रतिदिन तब्बल 100 टन क्षमतेच्या काजूवर प्रक्रिया होणारा हा प्रकल्प आहे. काजू निर्मितीबरोबरच काजू कवचापासून तेल निर्मितीही सुरु करण्यात आली असल्याचे माहिती सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे (Vilas Shinde) यांनी दिली. शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीबरोबरच गावातच रोजगाराची संधी निर्माण होणार असल्याचे शिंदे म्हणाले.


आदिवासी पट्टयातील भागाचे अर्थकारण उंचावणार


द्राक्ष आणि फलोत्पादन निर्यातीत आघाडीवर असलेल्या सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीने कोकण आणि आदिवासी पट्ट्यातील महत्वाचे पिक असलेल्या काजूच्या मुल्यसाखळी उभारणीवरही भर देण्यास सुरवात केली आहे. राज्यातील सर्वात मोठा काजू प्रक्रिया प्रकल्प सह्याद्री फार्म्स मध्ये कार्यान्वित करण्यात आला आहे. मोहाडीत 100 टन क्षमतेचा प्रक्रिया प्रकल्प उभारला आहे. यामुळं राज्यातील तसेच नाशिक जिल्ह्यातील आदिवासी पट्टयातील भागाचे अर्थकारण उंचावण्यास मदत होणार असल्याचे शिंदे म्हणाले. 


काजूमध्ये शेती आणि व्यापार वाढीला संधी 


जगात काजू उत्पादनात भारत म्हणून आपण जगात आघाडीवर असलो तरीही देशांतर्गत असलेली काजूची मागणीही आपण पूर्ण करु शकत नाही. इतकी या शेतीत आणि व्यापारात वाढीला संधी आहे. महाराष्ट्रात कोकणाबरोबरच सह्याद्रीच्या पर्वतरांगातील घाटमाथ्यावरील इतरही भागात काजूमुळं आर्थिक क्रांती घडवण्याची संधी आहे. या संधीचे रुपांतर ताकदीच्या मुल्यवर्धित साखळीत करण्याची गरज आहे. त्यासाठी सह्याद्रीने ही सुरुवात केल्याची माहिती शिंदे यांनी दिली.  


शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीबरोबरच गावातच रोजगाराची संधी


काजूची सरासरी उत्पादकता वाढवण्याबरोबरच दुसरीकडे काजू गर आणि बोंडापासून तयार होणाऱ्या उत्पादनांचे मोठे प्रकल्प उभारण्यावर भर देणे गरजेचे आहे. यातून केवळ काजू उत्पादक शेतकऱ्यांचेच उत्पन्न वाढणार नाही तर गावातच रोजगाराची संधी निर्माण झाल्यामुळं रोजगारासाठी शहरात गेलेला तरुणवर्ग पुन्हा गावात स्थिरावणार आहे. इतकी क्षमता यात आहे. त्यासाठी काजू पिकाच्या मुल्यसाखळ्या उभा करण्यावर ‘सह्याद्री फार्म्स‘ भर देणार असल्याचे शिंदे म्हणाले.  


सह्याद्रीच्या काजू प्रक्रिया प्रकल्पाची वैशिष्ट्ये


प्रति दिनी 100 टन कच्चे काजू हाताळणीची क्षमता 
देशातील टॉप 10 मधील आणि राज्यातील सर्वात मोठा प्रकल्प 
प्रक्रियेची सर्व यंत्रणा एकाच ठिकाणी 
काजू कवचापासून तेल काढणीचा 20 टन क्षमतेचा प्लॅन्ट 
उत्पादन गुणवत्तेच्या बीआरसी उच्च मानकांच्या समकक्ष व्यवस्थापन 
परिसरातील 300 हून अधिक महिलांना कायमस्वरुपी रोजगार


महत्त्वाच्या बातम्या:


Nashik News : 20 कोटींची गुंतवणूक, वर्षाला 30 हजार टन क्षमता, नाशिकच्या सह्याद्री फार्म्सने उभारला काजू प्रक्रिया प्रकल्प