Agriculture News : सध्या राज्यात पावसानं (Rain) चांगलीच ओढ दिली आहे. त्यामुळं खरीप हंगामातील (Kharif season) पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. या स्थितीमुळं राज्यातील बळीराजा चिंतेत आहे. दरम्यान, धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात देखील पावसानं पाठ फिरवली आहे. त्यामुळं उगवलेली पिकं जोपायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अशातच धाराशिव तालुक्यातील बावी येथील राठोड कुटुंबीय आपल्या शेतातील  मिरची (Chili) वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहे. पाण्याच्या बाटल्या आणून मिरचीला पाणी देऊन पिक वाचवण्याचा प्रयत्न करत आहे.
 
राज्यातील शेतकरी सध्या चिंतेत आहे. खरीपाची पिकं वाचवायची कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. 
राज्यातील बहुतांश जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. ऑगस्ट महिना संपत आला तरी अद्याप राज्यात म्हणावा तसा पाऊस पडला नाही. अशातच शेतातील पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड आपल्याला पाहायला मिळत आहे. 


जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याची गंभीर स्थिती निर्माण होण्याची भीती


गेल्या 20 दिवसापासून राज्यात पावसानं दडी मारली आहे. यंदाच्या पावसाळ्यात अद्यापही जोरदार पाऊस न झाल्याने नदी, नाले तहानलेले आहेत. विहिरी, बोअरवेलने तळ गाठला आहे. भविष्यात चारा आणि पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण होण्याची भीती आहे. पावसाअभावी हिरवा चारा उत्पादित करता येत नसल्याने दुधाचे उत्पादन घटल्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, टँकरने पाणीपुरवठा केला जात 


परतीच्या पावसाचा अंदाज


आत्तापर्यंत पावसाचं प्रमाण कमी असतानाच भारतीय हवामान विभागानं (IMD) पाच किंवा आठ ऑक्टोबरपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. पावसाची गरज असतानाच परतीच्या हवामान खात्यानं मॉन्सूनच्या परतीच्या तारखांचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत. ऑगस्ट महिन्याचा विचार केला तर राज्यात सरासरीच्या उणे 58 टक्के तूट निर्माण झाली आहे. कारण, ऑगस्ट महिन्यात सरासरीच्या फक्त 42 टक्के पाऊस झाला आहे. सर्वात विदारक परिस्थिती मराठवाड्यात आहेत. कारण तिथं सरासरीच्या केवळ 28 टक्के पाऊस झाला आहे.


पिकं वाया जाण्याच्या मार्गावर


यंदा पावसाने पाठ फिरवल्याने जमिनीतील पाणी पातळी देखील घटली आहे. विहरी आणि बोअरवेलचे पाणी आटले असल्याने पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पाऊस पडत नाही त्यात विहिरीत पाणी नसल्याने पिकांना पाणी कसे द्यावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उपस्थित राहिला आहे. त्यात पाणी नसल्याने डोळ्यासमोर पिकं उध्वस्त होत असल्याने त्याला जगवण्यासाठी बळीराजा धरपड करत असल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांनी पिकांची पेरणी करुन अडीच महिने झाले आहेत. पण अद्यापही चांगला पाऊस झाला नाही. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


kharif crop : खरीप पिकांच्या लागवडीत वाढ, कृषी मंत्रालयानं दिली माहिती; भात लागवडीत मोठी वाढ होऊनही निर्यातबंदी