टीम इंडियाचा विकेटकिपर आणि फलंदाज ऋषभ पंतचा काही दिवसांपूर्वी अपघात झाला.
गेल्या सहा दिवसांपासून त्याच्यावर देहरादूनच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पण आता पुढच्या उपचारांसाठी पंतला मुंबईत (Mumbai)आणलं जाणार आहे.
दरम्यान, सहा दिवसांपूर्वी दिल्लीहून जात असताना रुरकी येथे कार अपघातात पंतला दुखापत झाली होती.
त्यानंतर डेहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते.
कार अपघातानंतर क्रिकेटपटूच्या गुडघ्याला सतत सूज येत असून वेदनाही होत आहेत.
त्यामुळे पंतचा एमआरआय करता आला नाही.
दरम्यान, पंतला झालेल्या इतर जखमा भरल्या असून त्याची प्रकृतीही स्थिर आहेत.
गेल्या सहा दिवसांपासून देहरादूनच्या रुग्णालयात ऋषभ पंतवर उपचार सुरू असून
पुढील उपचारांसाठी त्याला मुंबईला हलवलं जाणार आहे.