'बटाट्याची चाळ', 'असा मी असा मी', 'व्यक्ती आणि वल्ली', 'खोगीरभरती', 'पुरचुंडी', 'नस्ती उठाठेव', 'गोळाबेरीज', 'हसवणूक' ही पुलंची गाजलेली पुस्तकं आहेत.

पु. ल. देशपांडे यांनी अनेक अजरामर नाटकं लिहिली आहेत. काही इंग्रजी नाटकांचे त्यांनी मराठीत भाषांतर केले आहे.

पुलंनी 1948 साली 'तुका म्हणे आता' हे पहिलं नाटक लिहिलं आणि त्यांचं पहिलचं नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं.

पुलंची 'तुझे आहे तुजपाशी', 'भाग्यवान', 'सुंदर मी होणार' ही नाटकं लोकप्रिय ठरली आहेत.

पुलंच्या नारायण, हरितात्या, पानवाला, म्हैस, पाळीव प्राणी, रावसाहेब अशा अनेक कथा आजही अनेकांना तोंडपाठ आहेत.

1947 ते 1954 या काळात पु. ल. देशपांडे यांनी अनेक सिनेमांसाच्या कथा, पटकथा, काव्य, संगीत, अभिनय आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली.

'वंदे मातरम', 'दूधभात', 'गुळाचा गणपती','भाग्यरेखा' हे पु. ल. देशपांडे यांचे गाजलेले सिनेमे आहेत.

पु. ल. देशपांडे यांचा 'देवबाप्पा' हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. या सिनेमातील 'नाच रे मोरा' हे गाणं चांगलचं लोकप्रिय झालं.

पु. ल. देशपांडे यांनी अकरा सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.

'गुळाचा गणपती' सिनेमातील 'इंद्रायणी काठी' या भीमसेन जोशींनी लोकप्रिय केलेल्या गाण्याचं संगीत पु.ल. देशपांडे यांचं होतं.