आयपीएलच्या पंधराव्या हंगामात मुंबई इंडियन्सनं अत्यंत निराशाजनक कामगिरी करत आहे.



त्यामुळे संघासह विशेषत: कर्णधार रोहित टीकांचा धनी झाला आहे.



दरम्यान मुंबईच्या निराशाजनक कामगिरीनंतर कर्णधार रोहितनं एक भावनिक ट्विट केलं आहे.



रोहित म्हणाला, आम्ही या स्पर्धेत आमचे सर्वोत्तम प्रदर्शन केले नाही, परंतु असं घडतं. अनेक दिग्गज खेळाडू या टप्प्यातून गेले आहेत.  तसेच आमच्या हितचिंतकांचे आभार मानतो, ज्यांनी संघावर विश्वास आणि अतूट निष्ठा दाखवली.



रोहितच्या या ट्वीटवर अनेक कमेंट्स येत असून त्याचे फॅन्स त्याला धीर देखील देत आहेत.



आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत झालेल्या 8 सामन्यांमध्ये पराभवच पाहिला आहे.



त्यामुळे पाच वेळा आयपीएल विजेता संघ यंदा मोठ्या अडचणीत आहे.



रविवारी लखनौ सुपरजायंट्सने मुंबईला 36 धावांनी पराभूत केलं.



मुंबईच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा संपल्या असल्या तरी उर्वरीत सामन्यात संघ काय करेल हे पाहावे लागेल.



मुंबईचा पुढील सामना 30 एप्रिल रोजी राजस्थान रॉयल्स विरुद्ध असेल.