भारतीय माणसांच्या आयुष्यात नारळाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.

आतल्या गोड पाण्यापासून बाहेरच्या टणक कवचापर्यंत सगळे भाग वापरले जातात.

Published by: जयदीप मेढे
Image Source: Pexel

रोजच्या बोलण्याचालण्यातही नारळ आल्याशिवाय रहात नाही.

Image Source: Pexel

असा कुठला उत्सव आहे जात नारळ वापरत नाहीत? गणपती बाप्पाच्या प्रसादातला नारळ असो किंवा ईदच्या शीरखुर्मातला!

Image Source: Pexel

सत्कार करताना दिलेला नारळ आणि नोकरीवरून काढून टाकताना दिलेला नारळही आहेच.

Image Source: Pexel

नारळ फोडून गोड निघाला तर खोबऱ्याच्या वड्या, दडपे पोहे, सोलकढी आणि कितीतरी जिन्नस होतात.

Image Source: Pexel

खवाट निघालं तर पाण्यात उकळून वर तरंगणारं कच्च तेल म्हणूनही वापरता येतं.

Image Source: Pexel

मग टाचांना पडलेल्या भेगा असोत की केसांना लावायला, घरगुती औषध!

Image Source: Pexel

नारळाचा कोणताही भाग वाया जात नाही. म्हणून त्याला श्रीफळ म्हणतात.

Image Source: Pexel

टीप :

(वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही)

Image Source: Pexel