हा राजवाडा, लाल आणि सॅन्डस्टोनने बांधला गेला आहे आणि वाऱ्यांचा राजवाडा म्हणून प्रसिद्ध आहे.
1799 मध्ये महाराजा सवाई प्रताप सिंग यांनी या अद्वितीय वास्तुकलेची निर्मिती केली होती. खेत्री महालाच्या रचनेने प्रेरित होऊन त्यांनी हवा महल बांधला.
हवा महलची मुख्य वैशिष्ट्ये म्हणजे त्याच्या अनेक लहान खिडक्या आणि बाल्कनी आहे.
राजघराण्यातुन बाहेरील जग पाहता यावे या उद्देशाने जाळीच्या खिडक्या बांधल्या. त्याचबरोबर राजवाडा आतून थंड आणि हवेशीर राहावा हा उद्देश साधला गेला.
राजवाड्यात 953 लहान खिडक्या, गुलाबी जाळी, कमानीचे छत आणि कॉर्निसेस आहेत, ज्यामुळे उन्हाळ्यातही महल हवेशीर राहतो.
हवा महल पाहण्यासाठी सर्वोत्तम सकाळची वेळ मानली जाते कारण पहाटे सूर्याच्या किरणांनी महल उजळून निघतो.
भगवान श्रीकृष्णाला समर्पित असलेला हा राजवाडा, श्रीकृष्णाच्या मुकुटासारखा दिसतो असे मानले जाते.
प्रसिद्ध चित्रपट ‘शुद्ध देसी रोमान्स’ आणि 'कोयल सी तेरी बोली' या गाण्याचे शूटिंग देखील येथे झाले आहे.