भारत-श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आलाय.



या सामन्यात भारताचा अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेलची संघात ऐन्ट्री झालीय.



कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना 12 मार्चपासून खेळवला जाणार आहे.



भारत-श्रीलंका यांच्यातील दुसरा कसोटी सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर डे- नाईट खेळवला जाणार आहे.



दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी अक्षर पटेलचं संघात पुनारागमन झालंय.



दुखापतीमुंळं अक्षर पटेल संघाबाहेर झाला होता.



त्याच्या जागी कुलदीप यादवला संघात स्थान देण्यात आलं होतं.



अक्षरच्या पुनरागमनामुळं कुलदीप यादव संघाबाहेर झालाय.