हिंदू धर्मात पितृ पक्षाला मोठं महत्त्व आहे, हा 16 दिवसांचा कालावधी आहे जो पूर्वजांना समर्पित आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexels

कंदमुळं खाऊ नका

हिंदू धर्मानुसार, जमिनीखाली तयार होणार्‍या भाज्यांचं अर्थात कंदमुळांचं सेवन पितृपक्षात करू नये.

Image Source: pexels

कंदमुळांमध्ये बटाटा, मुळा, रताळी यांसारख्या भाज्यांचा समावेश होतो.

Image Source: pexels

कांदा-लसूण खाऊ नये

शास्त्रात म्हटलं गेलंय की, प्रत्येक खाद्यपदार्थांच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावर आणि प्रकृतीवर, मानसिकतेवर परिणाम होतो.

Image Source: pexels

पितृपक्षात आहार आणि आचार हा सात्त्विक असावा असं शास्त्र सांगतं.

Image Source: pexels

मसूर डाळ खाऊ नये

पितृपक्षात मसूर डाळ देखील खाऊ नये किंवा मसूर डाळीचा नैवेद्य देखील पितरांना दाखवू नये.

Image Source: pexels

तुम्हाला वडे वैगेरे बनवायचे असतील तर तुम्ही इतर डाळींचा वापर करू शकता, परंतु मसूर डाळीचा वापर करू नये.

Image Source: pexels

चणे खाऊ नये

पितृपक्षात चणे खाणंही चुकीचं मानलं गेलं आहे.

Image Source: pexels

मांसाहार आणि दारूचं सेवन टाळावं

हिंदू धर्मातील प्रथेनुसार, पितृपक्षात मांसाहार किंवा अंडं खाणं पूर्णपणे वर्ज्य आहे.

Image Source: pexels

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे.

यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

Image Source: pexels