गणेशमूर्ती विसर्जनानंतर मुंबईच्या समुद्रकिनाऱ्यांवर दिसणारे दृश्य हे उदासीनतेचे दिसते.

विसर्जनानंतर मूर्तीचे अवशेष आणि प्लास्टिक हे सारं काही किनाऱ्यावर जमा होते.

अमृता फडणवीस यांनी आज मुंबईतील जुहू बीचवर स्वच्छता मोहिम राबवली आहे.

स्वच्छतेचे धडे गिरवून त्यांना आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात लागू करणे हा एकमेव उपाय असल्याचं अमृता म्हणाल्या.

या वर्षी अनेक किनारपट्टी साफ करण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आहे.

अमृता फडणवीस आणि भामला फाउंडेशन यांनी गणपती विसर्जनानंतर मुंबईतील बीच क्लीन अप मोहिमेत सहभाग घेतला होता.

बीच क्लीन अप मोहिमेत 2000 हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते.

ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर आणि परिणीती चोप्रा, अपारशक्ती खुराणा यांनीदेखील बीच क्लीन अप मोहिमेत सहभाग घेतला होता.

मुंबईच्या जुहू समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आलं होतं.

बीच क्लीन अप मोहिमेला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.