ABP News

यवतमाळ : पंतप्रधान मोदींच्या नावाने चिठ्ठी लिहून शेतकऱ्याची आत्महत्या

Continues below advertisement
यवतमाळमधील शंकर चायरे या शेतकऱ्याच्या आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली नाही तर जनआंदोलन उभारु असं काँग्रेस नेते नाना पटोले यांनी म्हटलंय... आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना कारणीभूत ठरवून यवतमाळमधील एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आहे...याप्रकरणी पंतप्रधान मोदींच्या विरोधात गुन्हा नोंदवला नाही तर कायदेशीर मार्गाचा अवलंब करण्याचंही पटोलेंनी सांगितलं आहे.
राजापूरवाडी इथे राहणार्या शंकर चायरे या शेतकऱ्याने शेतीचं नुकसान झाल्यामुळे जीवन संपवलं होतं. याप्रकरणी चायरे यांची मुलगी जयश्री चायरेनं मोदींविरोधात घाटंजी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram