वारी विशेष : अहमदनगर : हातात टाळ घेऊन जवानही वारकऱ्यांच्या दिंडीत
राज्याच्या कानाकोपऱ्यातून दिंड्या पंढरीच्या दिशेने रवाना झाल्या आहेत. ठिकठिकाणी दिंड्याचं स्वागत होत आहे. अहमदनगरच्या मेकनाइज इन्फ्रंट्री रेजिमेंट सेंटरचे अधिकारी आणि जवान गेल्या चार दिवसापासून वारकऱ्यांचं स्वागत करत आहेत. इतकंच नाही तर जवानही हातात टाळ घेऊन विठ्ठल भक्तीत दंग झाले आहेत.