वसई : अनधिकृत चाळींविरोधात मनसे आक्रमक, तहसीलदार कार्यालयात घोषणा, कारवाईची मागणी

वसईतल्या अनधिकृत चाळींच्या मुद्द्यावरुन मनसे आक्रमक झाली आहे. आज वसईत तहसिलदारांच्या कार्यालयात मनसे कार्यक्रत्यांनी घेराव घालून अनधिकृत चाळींवर कारवाईची मागणी केली.   वसईतल्या राजीवली वाघरालपाडा परिसरात डोंगर भूईसपाट करुन परप्रांतियांनी चाळी उभ्या केल्या आहेत. महत्वाचं म्हणजे इथं वन विभागाची 6 हजार एकरा आणि आदिवासींसाठी आरक्षित जागा आहे. मात्र महसूल आणि पोलीस खात्याला खिशात ठेवून परप्रांतियांनी इथं अतिक्रमण केलं आहे. त्यांना स्थानिक बिल्डरांचंही पाठबळ मिळतंय. एबीपी माझानं दाखवलेल्या या बातमीबाबत कालच्या जाहीर सभेत राज ठाकरेंनी सरकारचं लक्ष वेधलं. आणि कारवाईची मागणीही केली.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola