ठाणे : खाडीवरच्या अतिक्रमणांना जलसमाधीचा धोका!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पावसाळाच्या तोंडावर खाडीवर झालेल्या अतिक्रमणांना धोका निर्माण झाला आहे. ही अतिक्रमणं पावसाळ्यात पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसंच भविष्यात खाडीचा प्रवाह बदलण्याचा धोका व्यक्त केला जात आहे. एकीकडे खाडीतून जलवाहतूक सुरु करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र खाडीवर होणाऱ्या अतिक्रमणांकडे कुणाचंही लक्ष नाही. इथल्या झोपडपट्ट्यांवर कारवाई करण्याची धमक महापालिकेने दाखवलेली नाही. पावसाळ्यात एखादी मोठी दुर्घटना घडली, तर त्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न समोर येत आहे.