ठाणे : पुनर्वसनासाठी जोगीला तलाव परिसरातील झोपडपट्टीवासियांचं आंदोलन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ठाण्यात जोगीला तलावात भरणी टाकून त्याठिकाणी झालेली झोपडपट्टी हटवण्याची कारवाई ठाणे महापालिकेकडून सुरु झाली आहे. मात्र, येथील झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसनाचं आश्वासन द्या, त्यानंतरच घरं खाली करणार, अशी भूमिका येथील झोपडपट्टीवासियांनी घेतली आहे. त्यामुळे जोगीला तलाव परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी उथळसर प्रभाग समितीवर मोर्चा काढला. यावेळी महापालिकेने त्यांचं पुनर्वसन बीएसयुपीच्या घरात केले जाणार असल्याचं आश्वासन दिलं, त्यानंतर रहिवासी शांत झाले.