ठाणे : मुंब्रा बायपासचं काम पूर्ण होईपर्यंत टोल बंद ठेवा, राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन

Continues below advertisement
मुंब्रा बायपासचं काम सुरु असेपर्यंत ऐरोली आणि मुलुंडच्या टोलनाक्यावरील टोल वसुली बंद करा, या मागणीसाठी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आंदोलन केलं. मुलुंडच्या आनंदनगर टोलनाक्यावर टोल वसुली बंद पाडली आहे. यावेळी ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदेंच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंब्रा बायपासचं काम सुरु आहे. त्यामुळे ऐरोली आणि मुलुंड टोलनाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. त्या पार्श्वभूमीवर टोल वसुली थांबावी अशी मागणी होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram