लाल वादळ : ठाणे : शेतकऱ्यांचा मोर्चा आज मुंबईच्या वेशीवर
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मजल दर मजल करत हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा आता मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे. ठाण्यातल्या आजच्या मुक्कामानंतर हा मोर्चा 12 तारखेला विधीमंडळावर धडकणार आहे. किसान सभेतर्फे हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात मंत्रालयात आत्महत्या केलेले शेतकरी धर्मा पाटील यांचा मुलगा नरेंद्रही गावातील 25 शेतकऱ्यांसह सहभागी झाला आहे. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत विधीमंडळाला घेराव घालण्याचा इशारा या शेतकऱ्यांनी दिलाय. कर्जमाफी, शेतमालाला योग्य हमी भाव, शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षणात सवलती अशा मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी एल्गार पुकारला आहे.