श्रीनगर : सलग 32 तासांपासून करणनगरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक सुरुच

Continues below advertisement
श्रीनगरच्या करण नगरमध्ये तब्बल 32 तासांनंतरही दहशतवाद्यांसोबतच्या चकमक सुरुच आहे. थोड्याच वेळापूर्वी दुसऱ्या दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आलंय.
करण नगर भागात आणखी काही दहशतवादी असण्याची शक्यता वर्तवली जातेय... गेल्या 3 दिवसांमधला दहशतवाद्यांचा हा तिसरा मोठा हल्ला आहे.
तर मागच्या ४४ दिवसात भारताचे २६ जवान शहीद झाले आहेत. त्यामुळे केद्र सरकारनं कठोर पावलं उचलावीत, अशी मागणी जोर धरु लागलीय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram