Team India Mumbai : टीम इंडियाचं मुंबईत जंगी स्वागत करणार, ओपन बसमधून व्हिक्ट्री मार्च काढणार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppIndian Cricket Team In Mumbai: टीम इंडियाने (Indian Criclet Team) 29 जून 2024 रोजी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करुन टी-20 विश्वचषकावर (T20 World Cup 2024) आपले नाव कोरले. 2013 नंतर टीम इंडियाने आयसीसी ट्रॉफी जिंकली. या ऐतिहासिक विजयानंतर संपूर्ण देश आपल्या टीमचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहे. मात्र टीम इंडिया अजूनही बार्बाडोसमध्ये अडकून पडली आहे.
29 जून रोजी अंतिम सामना खेळला गेला, त्यानंतर तेथे आलेल्या चक्रीवादळाने टीम इंडियाला बार्बाडोसमध्येच राहावे लागले. वादळामुळे बार्बाडोसचे विमानतळ बंद करण्यात आले असून तेथे कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. टीम इंडिया गेल्या मंगळवारी तिथून रवाना होणार होती, पण त्याला देखील उशीर झाला. त्यामुळे उद्या सकाळी 6 वाजता टीम इंडिया दिल्लीत दाखल होणार आहे. यासाठी एक एअर इंडियाचं विशेष विमान बार्बाडोस विमानतळावर दाखल झाले आहे.