India vs Sri Lanka : बंगळुर कसोटीवर भारताची घट्ट पकड , श्रीलंकेचा पहिला डाव 109 धावात संपुष्टात

बंगळुुरु कसोटीवर दुसऱ्याच दिवशी भारतानं आपली पकड़ आणखी मजबूत केलीय...जसप्रीत बुमराच्या भेदक माऱ्यामुळं श्रीलंकेचा पहिला डाव १०९ धावात संपुष्टात आला.. दुसऱ्या डावातही श्रेयस अय्यर आणि रिषभ पंतच्या खेळीच्या जोरावर भारतानं 9 बाद 303 धावा केल्या...३०३ धावांवरच भारतानं दुसरा डाव घोषित केला.. श्रेयस अय्यरनं 67 , रिषभ पंतनं 50 तर रोहित शर्मानं 46 धावांची खेळी केली..श्रीलंकेतर्फे जयविक्रमानं 4 विकेट्स घेतल्या...दुसऱ्या डावात भारतीय धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेनं 1 विकेट गमावलीय...उद्याच म्हणजे तिसऱ्या दिवशी सामन्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola