प्लास्टिकबंदीचा रियालिटी चेक : कोल्हापुरातील मटण मार्केटमध्ये प्लास्टिकबंदीचा काय परिणाम?

Continues below advertisement
पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या प्लॅस्टिकला हद्दपार करण्यासाठी आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर प्लॅस्टिकबंदी लागू झाली आहे. पुणे, नाशिक आणि नागपूर या प्रमुख शहरांमध्ये प्लॅस्टिकजप्तीची कारवाई मोठ्या प्रमाणावर सुरु झालीय.. प्लॅस्टिकबंदीसाठी सरकारनं दंडात्मक कारवाई निश्चित केली आहे. यात तुमच्याकडे पहिल्यांदा प्लॅस्टिक आढळल्यास ५ हजार, दुसऱ्यांदा आढळल्यास १० हजार आणि तिसऱ्यांदा आढळल्यास २५ हजार रुपये दंड आणि तीन महिने कारावासाची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कारवाईची नामुष्की टाळण्यासाठी तुमच्याकडे असलेलं प्लॅस्टिक संकलन केंद्रात जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, कोणतीही पर्यायी व्यवस्था नसताना लागू केलेल्या या बंदीवर सर्वसामान्यांसह व्यापाऱ्यांकडून टीका होतेय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram