मुंबई : दूध उत्पादकांच्या आंदोलनानंतर सरकारला जाग, बैठकीसाठी निमंत्रण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
दूध उत्पादकांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर आता सरकारला जाग आली आहे. दूधदर प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी दूध उत्पादकांना मंत्रालयात चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. प्राथमिक पातळीवर चर्चा करण्यासाठी गिरीष महाजन यांनी दूध उत्पादकांना आमंत्रण दिलं आहे. 9 मे पर्यंत दुधाला सरकारनं ठरवल्याप्रमाणं दर न मिळाल्यास लाँग मार्च काढून मंत्रालयाला घेराव घालण्यात येईल अशा इशारा महाराष्ट्र किसान सभेतर्फे देण्यात आला आहे.
सरकारतर्फे दुधाला 27 रुपये प्रतिलीटरचा दर जाहिर करण्यात आलाय. मात्र स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना 17 ते 18 रुपये लीटरचाच दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. याविरोधात गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलनही झालं
सरकारतर्फे दुधाला 27 रुपये प्रतिलीटरचा दर जाहिर करण्यात आलाय. मात्र स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांना 17 ते 18 रुपये लीटरचाच दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. याविरोधात गेल्या आठवड्यात ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलनही झालं