जालना : बोंडअळी नुकसानभरपाई निर्णयाविरोधात न्यायालयात जाणार, बियाणं निर्माता कंपन्यांचा निर्णय

बोंडअळी प्रादुर्भावग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून मिळणाऱ्या मदतीत खोडा बसण्याची चिन्हं आहेत..काऱण बोंडअळीच्या प्रादुर्भावाला बियाणे कंपन्या जबाबदार नसून त्याला बीटी-२ हे तंत्रज्ञान पुरवणारी कंपनी जबाबदार असल्याचा दावा करत आता बियाणे कंपन्या कोर्टात जाणार आहे...
महा सिड्स असोसिएशनतर्फे ही माहिती देण्यात आलीय...बोंडअळीनं कापूस उत्पादकांचं नुकसान झाल्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांना मदत जाहीर केली..यासाठी कंपन्यांना नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे..मात्र शेतकऱ्यांचं हे नुकसान बियाणं कंपन्यांनी केलेलं नाही, माणकांप्रमाणंच कंपन्यांनी बियाणे निर्मिती केलीय असा कंपन्यांचा दावा आहे...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola